शिरुर (किरण पिंगळे) बालरंग भूमीच्या सदस्यांनी अध्यक्ष पदासाठी माझी निवड करुन माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांची आभारी असुन बालरंगभूमीच्या परिषदेच्या माध्यमातून आगामी काळात अनेक नवनवीन उपक्रम घेतले जाणार असून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातल्या तळागाळापर्यंत परिषदेचे उपक्रम पोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय बाल रंगभुमी परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा दिपाली शेळके यांनी केले.
निळू फुले कला अकादमी,पुणे येथे अखिल भारतीय बालरंगभूमी परिषदेच्या पुणे जिल्ह्याच्या नूतन कार्यकारणीची नुकतीच निवड करण्यात आली. बालरंगभूमीचे प्रमुख पदाधिकारी उदय लागू, दीपक रेगे, अरुण पटवर्धन, सुरेश देशमुख, रवींद्र सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी अध्यक्ष म्हणुन दिपाली शेळके यांची निवड करण्यात आली. भारतीय मराठी नाट्य परिषदेची संलग्न शाखा म्हणून बालरंग भूमिपरिषद २०१७ पासून पुणे जिल्ह्यात कार्यरत असुन मुलांसाठी विविध स्पर्धांच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करुन देत वर्षभर सातत्याने नाट्य स्पर्धांचे आयोजन करत असते.
नूतन कार्यकारणी खालील प्रमाणे
अध्यक्ष :- दिपाली शेळके (शिरुर)
उपाध्यक्ष :- अरुण पटवर्धन
उपाध्यक्ष :- नारायण करपे (खेड)
कार्याध्यक्ष :- दीपक रेगे
प्रमुख कार्यवाहक :- देवेंद्र भिडे
सहकार्यवाहक :- जतीन पांडे
सहकार्यवाह :- प्रकाश खोत (बारामती)
खजिनदार :- सत्यम कोठावदे
सहखजिनदार :- संध्या धुमाळ (हवेली)
कार्यकारणी सदस्य:- गिरीश भुतकर (भोर), सुधीर कदम (इंदापूर), अनुराधा काळे (आंबेगाव), प्रभा काळे (मावळ), मुग्धा वडके, स्मिता मोघे राजेंद्र आलमखाने यावेळी चंद्रकांत बुट्टे, प्रमोद पारधी, राजाराम गायकवाड, वैशाली पोतदार, विजयकुमार तांबे उपस्थित होते.
मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…
मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…
सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…
मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…
मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…
मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…