शिरुर (किरण पिंगळे) बालरंग भूमीच्या सदस्यांनी अध्यक्ष पदासाठी माझी निवड करुन माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी सर्वांची आभारी असुन बालरंगभूमीच्या परिषदेच्या माध्यमातून आगामी काळात अनेक नवनवीन उपक्रम घेतले जाणार असून शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातल्या तळागाळापर्यंत परिषदेचे उपक्रम पोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय बाल रंगभुमी परिषदेच्या नवनिर्वाचित अध्यक्षा दिपाली शेळके यांनी केले.
निळू फुले कला अकादमी,पुणे येथे अखिल भारतीय बालरंगभूमी परिषदेच्या पुणे जिल्ह्याच्या नूतन कार्यकारणीची नुकतीच निवड करण्यात आली. बालरंगभूमीचे प्रमुख पदाधिकारी उदय लागू, दीपक रेगे, अरुण पटवर्धन, सुरेश देशमुख, रवींद्र सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी अध्यक्ष म्हणुन दिपाली शेळके यांची निवड करण्यात आली. भारतीय मराठी नाट्य परिषदेची संलग्न शाखा म्हणून बालरंग भूमिपरिषद २०१७ पासून पुणे जिल्ह्यात कार्यरत असुन मुलांसाठी विविध स्पर्धांच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करुन देत वर्षभर सातत्याने नाट्य स्पर्धांचे आयोजन करत असते.
नूतन कार्यकारणी खालील प्रमाणे
अध्यक्ष :- दिपाली शेळके (शिरुर)
उपाध्यक्ष :- अरुण पटवर्धन
उपाध्यक्ष :- नारायण करपे (खेड)
कार्याध्यक्ष :- दीपक रेगे
प्रमुख कार्यवाहक :- देवेंद्र भिडे
सहकार्यवाहक :- जतीन पांडे
सहकार्यवाह :- प्रकाश खोत (बारामती)
खजिनदार :- सत्यम कोठावदे
सहखजिनदार :- संध्या धुमाळ (हवेली)
कार्यकारणी सदस्य:- गिरीश भुतकर (भोर), सुधीर कदम (इंदापूर), अनुराधा काळे (आंबेगाव), प्रभा काळे (मावळ), मुग्धा वडके, स्मिता मोघे राजेंद्र आलमखाने यावेळी चंद्रकांत बुट्टे, प्रमोद पारधी, राजाराम गायकवाड, वैशाली पोतदार, विजयकुमार तांबे उपस्थित होते.
ठाणे: ठाण्यातील टेंभी नाका येथील शिवसैनिकांचे श्रद्धास्थान असलेल्या आनंदआश्रमात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी…
मुंबईतील एनएससीआय डोम येथे होणार प्रारंभ; युवक, विद्यार्थी आणि नागरिकांना प्रतिज्ञेत सहभागी होण्याचे मंत्री मंगलप्रभात…
मुंबई: देशभरात सध्या जंतर-मंतरवरील आंदोलनाची चर्चा रंगली आहे. काही आंदोलनकर्त्यांनी वापरलेल्या अश्लील, अपमानास्पद आणि खालच्या…
७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…
शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…
शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…