मुख्य बातम्या

शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील सुवासिनींनी राजधानी दिल्लीत केली ‘वटपौर्णिमा’ साजरी

शिरुर (किरण पिंगळे): “वटपौर्णिमा” हा सण सर्वच सुवासिनीं महिलांसाठी महत्वाचा मानला जातो. सात जन्म हाच पती मिळावा यासाठी सुवासिनी महिला वडाच्या झाडाची मनोभावे पुजा करतात. शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील काही राजकीय तसेच सामाजिक काम करणाऱ्या महिलांना आंतरराष्ट्रीय पर्यावरण बहुउद्देशीय संस्था भारत या संस्थेचा पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यासाठी या सर्व महिला सध्या देशाची राजधानी दिल्ली येथे गेलेल्या आहेत. आज (दि 3) रोजी  “वटपौर्णिमा” सणानिमित्त आपली मराठमोळी संस्कृती जपत या सर्व सुवासनीं महिलानीं दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्याच्या परिसरात वडाची पुजा करुन वटपौर्णिमेचा सण साजरा केला आहे.

आंतरराष्ट्रीय पर्यावरण बहुउद्देशीय संस्था भारत या संस्थेचे अध्यक्ष देवा तांबे यांच्या प्रयत्नाने संस्थेच्या वतीने या सर्व महिलांना पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी दिल्लीत जाण्याची संधी मिळाली. सध्या या महिला दिल्लीत असुन आज (दि 3) रोजी दिल्ली येथे “वटपौर्णिमा” सणाच्या निमित्ताने शिरुर तालुक्यातील निमोणे गावाच्या माजी आदर्श सरपंच जिजाबाई दुर्गे तसेच श्रीगोंदा तालुक्यातील पंचायत समिती सदस्या कल्याणी लोखंडे, देवदैठणच्या माजी आदर्श सरपंच मंगल कौठाळे, राजापुरच्या विद्यमान सरपंच प्रतीक्षा मेंगवडे, आरोग्य खात्याच्या आशा गुंड, निवृत्त शिक्षिका सुजाता रासकर या सर्व महिला सुवासिनींनी दिल्ली येथील लाल किल्ल्याच्या परिसरात असणाऱ्या वडाच्या झाडाची पूजा करुन मराठमोळी संस्कृती जपत “वटपौर्णिमा” हा सण साजरा केला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणूक आयोगाची नोटीस; पक्षघटनेतील बदलांवर मागवली महत्त्वाची कागदपत्रे

सुनेत्रा पवार यांना आयोगाचे पत्र; कलम ६, ७, १२, ३२ आणि ३६ मधील दुरुस्त्यांबाबत वैध…

2 मिनिटे ago

श्रावणात घरी आणा या 3 पवित्र वस्तू; महादेवांची कृपा, सुख-समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल अशी मान्यता

वास्तुशास्त्रानुसार श्रावण महिन्यात शिवलिंग, शंख आणि गंगाजल घरात ठेवल्याने धार्मिक वातावरण निर्माण होते आणि सकारात्मकता…

20 मिनिटे ago

सोने-चांदी पुन्हा महागले! आजचे नवीन दर पाहून ग्राहकांना धक्का

मुंबई: जागतिक घडामोडींचा परिणाम पुन्हा एकदा सराफा बाजारावर दिसून येत आहे. अमेरिकेतील व्याजदरांबाबतच्या अपेक्षा, डॉलरमधील…

26 मिनिटे ago

हजारो कोटींचा खर्च, तरीही कचऱ्याचा विळखा; मुंबईला आता परिणामकारक प्रशासनाची गरज

मुंबई : मुंबईच्या स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, मलनिस्सारण आणि पर्यावरण संरक्षणासाठी दरवर्षी हजारो कोटी रुपयांचा निधी…

57 मिनिटे ago

‘गुंगी गुडिया’ वाद पेटला! काँग्रेसवरच भडकल्या अंजली दमानिया; सुनेत्रा पवारांच्या समर्थनार्थ भूमिका

काँग्रेसच्या टीकेवर दमानियांचा आक्षेप; "अशी भाषा कोणत्याही पक्षाला शोभणारी नाही" मुंबई : बीडमधील पत्रकार परिषदेदरम्यान…

1 तास ago

प्राजक्ता माळीच्या तुळजाभवानी मंदिरातील फोटोंवरून वाद; ‘सामान्यांसाठी एक नियम, सेलिब्रिटींसाठी दुसरा?’

गाभाऱ्यातील फोटोंवरून सोशल मीडियात संतप्त प्रतिक्रिया; मंदिर प्रशासनाकडून स्पष्टीकरणाची मागणी मुंबई: अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने…

1 तास ago