शिरूर तालुका

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त वन विभागाकडून जनजागृती…

शिरुर: टाकळी हाजी (ता. शिरुर) येथे वन विभाग शिरुर कार्यालयामार्फत ग्रामस्थांना एकत्र करुन बिबट्या पासून संरक्षण आणि बिबट्याचे संवर्धन या विषयावर शिरुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सविता चव्हाण, विठ्ठल भुजबळ, आनंदा शेवाळे, अभिजित सातपुते या टीम कडून जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे.

वाघ, बिबट्या, अस्वल, गवा, रानडुक्कर, लांडगा, कोल्हा, हत्ती, रान कुत्रे यांच्या हल्ल्यात मनुष्य हानी झाल्यास किंवा व्यक्ती मृत झाल्यास १५ लाख रुपये, गाय बैल म्हैस ६० हजार रुपये, व्यक्ती कायम अपंग झाल्यास ५ लाख रुपये, व्यक्ती गंभीर जखमी झाल्यास १ लाख २५ हजार रुपये, व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास २० हजार रुपये शासनाच्या वतीने लाभ मिळणार असल्याचे वनरक्षक सविता चव्हाण यांनी सांगितले. तसेच बिबट्या पासून संरक्षण कसे करावे याबद्दल माहिती देण्यात आली.

यावेळी माजी पंचायत समिती सदस्या अरुणाताई घोडे, माजी ग्रामपंचायत सदस्या वंदनाताई खामकर, पोलीस पाटील शोभाताई मंदिलकर, सखाराम खोमणे, शंकर घोडे, तबाजी मंदिलकर, कुंडलिक जाधव, रोहिदास घोडे, योगेश हिलाळ, पोपट घोडे, भाऊसाहेब टेमकर,दादाभाऊ घोडे,नितीन थोरात, सनी गावडे, स्वप्नील चोरे, बाबू चोरे, बाळासाहेब खटाटे, माऊली रसाळ, पत्रकार प्रवीण गायकवाड, साहेबराव लोखंडे, आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुण्यात पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना विषबाधा; गुरुनानक डेरी सील, FDAची कारवाई

पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…

6 तास ago

ठाकरे गटाला मोठा धक्का? ६ खासदार शिंदे गटाच्या संपर्कात; सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…

6 तास ago

पावसाळ्यात ओलसर कपडे घालताना काळजी घ्या

सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…

6 तास ago

तंत्रज्ञानाचा अतिवापर व्यसनापेक्षा कमी नाही, मानसिक आरोग्यावर होतोय परिणाम

बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…

6 तास ago

पालक भाजीचे गुणधर्म

सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…

6 तास ago

सक्षम ताटे प्रकरणाला नवा ट्विस्ट; आंचलच्या आरोपांवर कुटुंबीयांचा पलटवार

नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…

8 तास ago