गटविकास अधिकारी, तहसिलदार यांच्याकडे केला अर्ज दाखल
शिरूर (अरुणकुमार मोटे): साबळेवाडी (ता. शिरूर) येथील अतिक्रमण हटवण्याची कारवाई झाल्यानंतर आता चांडोह गावातील अतिक्रमण कधी हटवले जाणार याबाबत नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
चांडोह येथे काही व्यावसायिकांनी सार्वजनिक जागांवर रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर बांधकामे करून व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या अतिक्रमणांविरोधात एका नागरीकाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, चांडोह गावात रस्त्यालगत वळणावर काही लोकांनी बांधकाम करून त्यास पुढे पत्राची खोली काढून अतिक्रमण केले आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच याठिकाणी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करून दुकाने सुरू केले आहे. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयींचा विचार करून संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित चौकशी करून अतिक्रमण काढणे बाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
साबळेवाडी येथील कारवाईनंतर प्रशासनाने आता चांडोह गावातील बेकायदेशीर अतिक्रमण ताबडतोब काढून टाकावे , अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय 'कमळी' मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून,…
मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे शरीरास होतात.…
निविदा प्रक्रियेमुळे अवैध राख माफियांना लगाम; तीन वर्षांतील सर्वाधिक महसूल महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या तिजोरीत…
शिरुर (तेजस फडके): अहिल्यानगर-पुणे महामार्गावर सरदवाडी गावाजवळ भरधाव पेट्रोल-डिझेल टँकरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने…
शिरूर (तेजस फडके) : वैद्यकीय क्षेत्रात रुग्णालयांमधील स्पर्धा, उपलब्ध सुविधा आणि रुग्णसंख्या यांची नेहमीच चर्चा…
आजकालच्या लाइफ स्टाईलमध्ये शरीरात कोलेस्ट्रॉल जमा होऊन नसा ब्लॉक होणं एक सामान्य समस्या बनली आहे.…