गटविकास अधिकारी, तहसिलदार यांच्याकडे केला अर्ज दाखल
शिरूर (अरुणकुमार मोटे): साबळेवाडी (ता. शिरूर) येथील अतिक्रमण हटवण्याची कारवाई झाल्यानंतर आता चांडोह गावातील अतिक्रमण कधी हटवले जाणार याबाबत नागरिकांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.
चांडोह येथे काही व्यावसायिकांनी सार्वजनिक जागांवर रस्त्याच्या कडेला बेकायदेशीर बांधकामे करून व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणी येत असून वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. या अतिक्रमणांविरोधात एका नागरीकाने विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला आहे.
तक्रारीनुसार, चांडोह गावात रस्त्यालगत वळणावर काही लोकांनी बांधकाम करून त्यास पुढे पत्राची खोली काढून अतिक्रमण केले आहे. यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच याठिकाणी सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करून दुकाने सुरू केले आहे. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयींचा विचार करून संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित चौकशी करून अतिक्रमण काढणे बाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
साबळेवाडी येथील कारवाईनंतर प्रशासनाने आता चांडोह गावातील बेकायदेशीर अतिक्रमण ताबडतोब काढून टाकावे , अशी मागणी जोर धरू लागली आहे. प्रशासन यावर काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…
मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…