महाराष्ट्र

जिल्हा परिषद निकाल LIVE: राष्ट्रवादीचा पहिला विजय,  भाजप-शिंदे गटाची राज्यात आघाडी

मुंबई: जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून टपाल मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता ईव्हीएममधील आकडे समोर येत आहेत. या निकालांमध्ये माढा तालुक्यातून पहिला अधिकृत निकाल समोर आला आहे.

माढा तालुक्यातील भोसरे जिल्हा परिषद गटातून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी दळवी यांनी विजय मिळवला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

निवडणूक प्रचारासाठी बारामतीकडे येत असताना अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लढवली जात असून, काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येऊन निवडणूक लढवत असल्याचेही पाहायला मिळाले.

राज्यात भाजप आघाडीवर

राज्यातील एकूण कल पाहता सुरुवातीच्या टप्प्यात भाजप आघाडीवर असल्याचे चित्र आहे.

भाजपचे सुमारे 60 उमेदवार आघाडीवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे 30 उमेदवार आघाडीवर

शिवसेना (शिंदे गट) देखील 30 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.

कोल्हापुरात काँग्रेसची दमदार सुरुवात

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसने चांगली सुरुवात केली आहे.घुणकी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार विजयी झाल्या आहेत.पंचायत समिती नवे पारगाव येथे काँग्रेसचे भारत विरधवल पाटील विजयी झाले आहेत.तसेच घुणकी पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या संगीता संग्राम पाटील यांनी विजय मिळवला आहे.निवडणूक निकालांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील काही तासांत अधिक स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

7 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

17 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

17 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

17 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

17 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

17 तास ago