मुंबई: जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली असून टपाल मतमोजणी पूर्ण झाली आहे. त्यानंतर आता ईव्हीएममधील आकडे समोर येत आहेत. या निकालांमध्ये माढा तालुक्यातून पहिला अधिकृत निकाल समोर आला आहे.
माढा तालुक्यातील भोसरे जिल्हा परिषद गटातून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी दळवी यांनी विजय मिळवला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्याने या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
निवडणूक प्रचारासाठी बारामतीकडे येत असताना अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले होते. या पार्श्वभूमीवर ही निवडणूक लढवली जात असून, काही ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट एकत्र येऊन निवडणूक लढवत असल्याचेही पाहायला मिळाले.
राज्यात भाजप आघाडीवर
राज्यातील एकूण कल पाहता सुरुवातीच्या टप्प्यात भाजप आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
भाजपचे सुमारे 60 उमेदवार आघाडीवर
राष्ट्रवादी काँग्रेसचे 30 उमेदवार आघाडीवर
शिवसेना (शिंदे गट) देखील 30 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे.
कोल्हापुरात काँग्रेसची दमदार सुरुवात
कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसने चांगली सुरुवात केली आहे.घुणकी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसच्या शुभांगी महेश कुंभार विजयी झाल्या आहेत.पंचायत समिती नवे पारगाव येथे काँग्रेसचे भारत विरधवल पाटील विजयी झाले आहेत.तसेच घुणकी पंचायत समितीमध्ये काँग्रेसच्या संगीता संग्राम पाटील यांनी विजय मिळवला आहे.निवडणूक निकालांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून पुढील काही तासांत अधिक स्पष्ट चित्र समोर येण्याची शक्यता आहे.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…