मुंबई: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचा कारभार हाती घेतला आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी इतिहास रचला आहे.
सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्रिपदाबरोबरच आता त्या पक्षाची सूत्रेही हाती घेण्याच्या तयारीत असून, त्यांनी पक्षातील नेते, मंत्री आणि आमदारांशी संवाद सुरू केला आहे.
नेते-मंत्र्यांना थेट फोन, पाठिंब्यासाठी आभार
उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या सर्व प्रमुख नेते आणि मंत्र्यांना फोन करून संवाद साधल्याची माहिती आहे. कठीण काळात पाठीशी उभे राहिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले असून, पुढील काळातही अशीच साथ आणि सहकार्य अपेक्षित असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या संवादामुळे पक्षात एकसंघपणा निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.
शोकसभेनिमित्त शरद पवार आणि सुनेत्रा पवार आमने-सामने
अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीतील सहयोग सोसायटीमध्ये आयोजित शोकसभेत पवार कुटुंबातील सर्व प्रमुख सदस्य उपस्थित होते. या वेळी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यासह शरद पवारही उपस्थित होते. शोकसभेच्या निमित्ताने शरद पवार आणि सुनेत्रा पवार आमने-सामने आले. मात्र या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
शरद पवारांकडून नातवांना कामकाजाचे धडे
दरम्यान, विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांच्या बैठकीत शरद पवारांनी नातू पार्थ आणि जय पवार यांना संस्थेच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन केल्याचं समजत आहे. अजित पवार संस्थेमध्ये कोणती भूमिका बजावत होते, त्यांचं कार्य पुढे कसं नेता येईल, यासंदर्भात इतर विश्वस्तांनीही सविस्तर माहिती दिली.
ही बैठक पार्थ आणि जय पवार यांची विद्या प्रतिष्ठानमधील पहिलीच सहभागाची बैठक होती. मात्र अजित पवारांची जागा संस्थेत कोण घेणार, याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…