महाराष्ट्र

अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार सत्तेच्या केंद्रस्थानी; पक्षातील नेते-मंत्र्यांशी थेट संवाद

मुंबई: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचा कारभार हाती घेतला आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी इतिहास रचला आहे.

सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही महत्त्वाची खाती सोपवण्यात आली आहेत. उपमुख्यमंत्रिपदाबरोबरच आता त्या पक्षाची सूत्रेही हाती घेण्याच्या तयारीत असून, त्यांनी पक्षातील नेते, मंत्री आणि आमदारांशी संवाद सुरू केला आहे.

नेते-मंत्र्यांना थेट फोन, पाठिंब्यासाठी आभार

उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या सर्व प्रमुख नेते आणि मंत्र्यांना फोन करून संवाद साधल्याची माहिती आहे. कठीण काळात पाठीशी उभे राहिल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले असून, पुढील काळातही अशीच साथ आणि सहकार्य अपेक्षित असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे. या संवादामुळे पक्षात एकसंघपणा निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

शोकसभेनिमित्त शरद पवार आणि सुनेत्रा पवार आमने-सामने

अजित पवारांच्या निधनानंतर बारामतीतील सहयोग सोसायटीमध्ये आयोजित शोकसभेत पवार कुटुंबातील सर्व प्रमुख सदस्य उपस्थित होते. या वेळी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्यासह शरद पवारही उपस्थित होते. शोकसभेच्या निमित्ताने शरद पवार आणि सुनेत्रा पवार आमने-सामने आले. मात्र या भेटीत नेमकी कोणती चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

शरद पवारांकडून नातवांना कामकाजाचे धडे

दरम्यान, विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांच्या बैठकीत शरद पवारांनी नातू पार्थ आणि जय पवार यांना संस्थेच्या कामकाजाबाबत मार्गदर्शन केल्याचं समजत आहे. अजित पवार संस्थेमध्ये कोणती भूमिका बजावत होते, त्यांचं कार्य पुढे कसं नेता येईल, यासंदर्भात इतर विश्वस्तांनीही सविस्तर माहिती दिली.

ही बैठक पार्थ आणि जय पवार यांची विद्या प्रतिष्ठानमधील पहिलीच सहभागाची बैठक होती. मात्र अजित पवारांची जागा संस्थेत कोण घेणार, याबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

12 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

17 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

17 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

17 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

17 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

19 तास ago