मुंबई: मुंबईत कोसळणार्या मुसळधार पावसाने न्यू अशोक नगर, वाशी नाका,चेंबूर येथील संरक्षक भिंत कोसळून घरांचे नुकसान झाले मात्र जिवितहानी झालेली नाही. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली
दरम्यान या घटनेनंतर अणुशक्तीनगरच्या आमदार सना मलिक – शेख यांनी घटनास्थळी भेट देत बाधित कुटुंबाचे तात्पुरते पुनर्वसन करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.
न्यू अशोक नगर, वाशी नाका,चेंबूर येथील संरक्षण भिंतीच्या बाजूला असलेली बंद दोन घरे संरक्षण भिंतीसह खाली कोसळली त्यामुळे भिंतीच्या खालील बाजूस असलेल्या घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच आमदार सना मलिक – शेख यांनी घटनास्थळी धाव घेत बाधित कुटुंबांसाठी तात्पुरते पुनर्वसन व मूलभूत सुविधांची व्यवस्था तातडीने करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभाग, एम-पूर्व वॉर्ड देखभाल विभागाशीही आमदार सना मलिक – शेख यांनी संपर्क साधून अग्निशमन दल तसेच आरसीएफ पोलीस स्टेशनचे अधिकारी तात्काळ भिंत कोसळलेल्या ठिकाणी बोलावले.
रविवारीच घटनास्थळाचा आरसीएफ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून या घटनेनंतर आमदार सना मलिक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण टीम मदतकार्यास तैनात ठेवली आहे.
मुंबई: 27 एप्रिल २०२६, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांना ‘खड्डेमुक्ती’ अभियानातील गंभीर अनियमितता…
जवस हे एक गळिताचे धान्य आहे. यालाच मराठीत अळशी, गुजराथीत अलसी, हिंदीत अलसी किंवा तिसी,…
छातीत दुखणे हे एक चिंताजनक लक्षण असू शकते, ज्यामुळे त्वरित लक्ष देणे आणि मूल्यांकन करणे…
मुंबई: महाराष्ट्र शासनाने पद्म पुरस्कारांसाठी स्थापन केलेल्या समितीत सांस्कृतिक मंत्र्यांना स्थान न दिल्याने राजकीय वर्तुळात…
पुणे: महापालिकेच्या स्थायी समितीने महिलांच्या नावावर असलेल्या ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मिळकतकरात ५० टक्के सवलत…
पुणे: शहरात निष्काळजीपणा आणि बेफिकीर वाहनचालकांमुळे दोन गंभीर दुर्घटना घडल्या असून, यात एका चिमुकल्या मुलीचा…