मुंबई: मुंबईत कोसळणार्या मुसळधार पावसाने न्यू अशोक नगर, वाशी नाका,चेंबूर येथील संरक्षक भिंत कोसळून घरांचे नुकसान झाले मात्र जिवितहानी झालेली नाही. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली
दरम्यान या घटनेनंतर अणुशक्तीनगरच्या आमदार सना मलिक – शेख यांनी घटनास्थळी भेट देत बाधित कुटुंबाचे तात्पुरते पुनर्वसन करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.
न्यू अशोक नगर, वाशी नाका,चेंबूर येथील संरक्षण भिंतीच्या बाजूला असलेली बंद दोन घरे संरक्षण भिंतीसह खाली कोसळली त्यामुळे भिंतीच्या खालील बाजूस असलेल्या घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच आमदार सना मलिक – शेख यांनी घटनास्थळी धाव घेत बाधित कुटुंबांसाठी तात्पुरते पुनर्वसन व मूलभूत सुविधांची व्यवस्था तातडीने करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभाग, एम-पूर्व वॉर्ड देखभाल विभागाशीही आमदार सना मलिक – शेख यांनी संपर्क साधून अग्निशमन दल तसेच आरसीएफ पोलीस स्टेशनचे अधिकारी तात्काळ भिंत कोसळलेल्या ठिकाणी बोलावले.
रविवारीच घटनास्थळाचा आरसीएफ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून या घटनेनंतर आमदार सना मलिक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण टीम मदतकार्यास तैनात ठेवली आहे.
पाबळ (सुनील जिते) : शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई परिसरातील गारकोलवाडी हे गाव अत्यंत दुष्काळी व…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे क्रिकेट स्पर्धेदरम्यान झालेल्या फायरींग प्रकरणातील दोन मुख्य…
संवेदनशीलता आणि मानवतेचे दर्शन घडवणारी घटना जेजुरी: जेजुरी येथे दर्शनासाठी आलेली तीन वर्षांची चिमुकली हरवल्याने काही…
शिक्रापूर (ओमकार भोरडे): पारोडी हद्दीतील एनएच-५४८ महामार्गालगत उभारण्यात आलेला जिओ कंपनीचा मोबाईल टॉवर वारंवार बंद…
नवनियुक्त पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांची प्रत्यक्ष बाजारात भेट; साध्या वेशातील पथके तैनात होणार शिक्रापूर…
शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघाच्या शिरूर तालुका कार्यकारिणीची बैठक नुकतीच शिरूर येथे उत्साहात…