मुंबई: मुंबईत कोसळणार्या मुसळधार पावसाने न्यू अशोक नगर, वाशी नाका,चेंबूर येथील संरक्षक भिंत कोसळून घरांचे नुकसान झाले मात्र जिवितहानी झालेली नाही. ही घटना रविवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली
दरम्यान या घटनेनंतर अणुशक्तीनगरच्या आमदार सना मलिक – शेख यांनी घटनास्थळी भेट देत बाधित कुटुंबाचे तात्पुरते पुनर्वसन करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले.
न्यू अशोक नगर, वाशी नाका,चेंबूर येथील संरक्षण भिंतीच्या बाजूला असलेली बंद दोन घरे संरक्षण भिंतीसह खाली कोसळली त्यामुळे भिंतीच्या खालील बाजूस असलेल्या घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच आमदार सना मलिक – शेख यांनी घटनास्थळी धाव घेत बाधित कुटुंबांसाठी तात्पुरते पुनर्वसन व मूलभूत सुविधांची व्यवस्था तातडीने करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. याठिकाणी आपत्ती व्यवस्थापन विभाग, एम-पूर्व वॉर्ड देखभाल विभागाशीही आमदार सना मलिक – शेख यांनी संपर्क साधून अग्निशमन दल तसेच आरसीएफ पोलीस स्टेशनचे अधिकारी तात्काळ भिंत कोसळलेल्या ठिकाणी बोलावले.
रविवारीच घटनास्थळाचा आरसीएफ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला असून या घटनेनंतर आमदार सना मलिक शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण टीम मदतकार्यास तैनात ठेवली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…
मुंबई : राज्यातील जमिनीच्या आणि मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि मालकी हक्क अधिक बळकट करण्यासाठी…
रात्रीचं जागरण, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता…