मुंबई: मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि भाजपमधील दुरावा वाढत असतानाच, शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील संबंध अधिक दृढ होताना दिसत आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील राजकीय अंतर कमी होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
फडणवीसांचे सूचक विधान
एका मुलाखतीत फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा युती होण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट नाही म्हणण्याऐवजी “राजकारणात काहीही घडू शकतं” असं सूचक विधान केलं.
पाच वर्षांत मी एक गोष्ट शिकलो आहे-कधी कशालाच ‘नाही’ म्हणू नये. कारण राजकारणात काहीही होऊ शकतं. मात्र, सध्याच्या परिस्थितीत उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांच्या पक्षांसोबत कोणतीही युती होणार नाही, असे फडणवीस म्हणाले.
विरोधकांशी चांगले संबंध असल्याचा दावा
फडणवीस यांनी विरोधकांशी कायम संवाद ठेवण्यावर भर असल्याचे सांगितले. “मी बदला घेण्यासाठी नाही, तर बदल घडवण्यासाठी राजकारणात आलो आहे. त्यामुळे विरोधकांशी कायम चांगले संबंध ठेवतो. मी आणि ठाकरे आजही एकमेकांशी फोनवर बोलतो,” असे त्यांनी स्पष्ट केले.
ठाकरेंनी माझा फोन उचलला असता तर…
फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या उद्धव ठाकरे यांना टोला लगावत, जर उद्धव ठाकरेंनी योग्य वेळी माझा फोन उचलला असता, तर दोन्ही पक्षांमध्ये फूट पडली नसती. मात्र, आता आम्ही एकमेकांचे फोन उचलतो, असे ते म्हणाले.
भविष्यात नवे समीकरण शक्य?
सध्याच्या घडामोडींवरून भाजप-शिवसेना (शिंदे गट) युती मजबूत होत असली तरी, ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील दुरावा कमी होतो आहे का? हा प्रश्न उपस्थित होतो. फडणवीसांनी सध्या युतीच्या शक्यतेला नकार दिला असला, तरी राजकीय समीकरणे कधीही बदलू शकतात, असे त्यांनी सूचित केले आहे.
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…
ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…