देवळाली, इगतपुरी विधानसभा मतदारसंघामधील उबाठा, शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी राष्ट्रवादीत…
मुंबई: लोकांची कामे केली तर लोकं आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहतात हा आमचा अनुभव असून लोकांच्या अडीअडचणी सोडवा… त्यांच्या सुखदु:खात सहभागी व्हा… असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आज कार्यकर्त्यांना केले.
नाशिक जिल्हयातील देवळाली व इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील उबाठा आणि वंचित, शरदचंद्र पवार गटातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत आज जाहीर पक्षप्रवेश केला.
शेतकरी, युवकांसाठी कुशल रोजगार देणार्या योजना सरकार राबवत आहे. केंद्रसरकारने राज्याला २० लाख घरांचे उद्दिष्ट दिले आहे. आपापल्या भागात या योजनांचा लाभ लोकांना कसा मिळेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करा. जितके लोकांपर्यंत पोहोचाल तेवढा पक्षवाढीला हातभार लागणार आहे असे सांगतानाच स्वातंत्र्याची ७८ वर्षे पूर्ण होत आली तरी अजूनही काही लोकं बेघर आहेत त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या या घरकुल योजनेचा लाभ नक्की मिळणार आहे असेही अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.
पराभव झाला तर विरोधक निवडणूक आयोगाला दोष देतात आणि जिंकले तर उदोउदो करतात. अरे निवडणूक आयोग जर चुकत असेल तर न्यायव्यवस्था आहे ना असा संतप्त सवाल करतानाच मी बारामतीतून सलग निवडणूका जिंकलो आहे त्यात कधी असे काही घडले नाही हेही आवर्जून अजितदादा पवार यांनी सांगितले.
नाशिक जिल्हयातील देवळाली व इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील विविध पक्षातील पदाधिकाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शेतकरी संघाचे नाशिक तालुकाध्यक्ष शरद गायके , शरदचंद्र पवार गटाचे नाशिक तालुकाध्यक्ष विष्णू थेटे, सचिन पिंगळे यांच्यासह नाशिक जिल्हयातील विविध पक्षातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील त्र्यंबकेश्वर येथील वंचित आघाडीचे नेते कृष्णा काशीद यांनीही आपल्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार सरोज अहिरे, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे, माजी मंत्री अनिल भाईदास पाटील, आमदार संजय खोडके, आमदार हिरामण खोसकर, आमदार राजेश विटेकर, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, उमेश नेमाडे, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदी उपस्थित होते.
१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…
मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…
मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…
ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…
मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…
शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…