मुंबई: विद्यार्थ्यांमधील कला, सृजनशीलता आणि नवोन्मेषी विचारांना चालना देण्यासाठी जवाहर बालभवनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला मोठी मदत होते, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन, मुंबई येथे गणेशोत्सवानिमित्त आयोजित विविध सांस्कृतिक आणि सर्जनशील उपक्रमांना शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीतसिंह देओल आणि शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींची पाहणी करून त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांना स्वनिर्मितीचा आनंद मिळावा आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनतर्फे २ ते ९ सप्टेंबरदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ‘गणेश मूर्ती कृतिसत्र’, ‘वेशभूषा स्पर्धा’ आणि ‘गणेश मूर्ती बनविणे स्पर्धा’ यांचा समावेश आहे.
इयत्ता तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणेश मूर्ती कृतिसत्र आयोजित करण्यात आले आहे. तर इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी पौराणिक वेशभूषेवर आधारित स्पर्धा घेण्यात येत आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, भारतीय संस्कृती आणि सामाजिक संदेश आपल्या कलाकृतीतून प्रभावीपणे मांडण्याची संधी मिळत आहे.
यंदा प्रथमच गणेश मूर्ती बनविण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, त्याला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांनी साकारलेल्या आकर्षक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तसेच विविध कलाकृतींची मंत्री दादाजी भुसे यांनी पाहणी केली.
विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि कौशल्याचे कौतुक करताना भुसे म्हणाले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास आणि सर्जनशीलता वाढण्यासोबतच भारतीय संस्कृती आणि पर्यावरणाबाबतची जाणीव अधिक दृढ होते.
महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवन ही संस्था ४ ते १६ वर्षे वयोगटातील बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. गणेशोत्सवानिमित्त आयोजित हे कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारे ठरत आहेत, अशी माहिती बालभवनच्या संचालक नीता पाटील यांनी दिली.
पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या चर्चेदरम्यान सत्ताधारी भाजपच्या ज्येष्ठ नगरसेविका आणि माजी उपमहापौर शैलजा मोरे यांच्या…
पुणे : पुणे जिल्ह्यातून गुन्हेगारीच्या दोन धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. राजगुरुनगरमध्ये पत्नीचा खून करून…
छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाप्रमुख तथा माजी सरपंच राजू राठोड यांचे आज मुंबईतील…
मुंबई: राज्यातील प्रत्येक शाळेत स्वच्छता, शुद्ध पिण्याचे पाणी, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थीकेंद्रित वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षण…
‘बायोमॅन्युफॅक्चरिंग टास्क फोर्स’ स्थापन करण्याचा प्रस्ताव; तंत्रज्ञान, गुंतवणूक आणि रोजगारनिर्मितीवर भर मुंबई: जैवतंत्रज्ञान, संशोधन, व्यापार आणि…
पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…