महाराष्ट्र

मेट्रो स्लॅब दुर्घटनेवरून राजकारण तापले; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: वडाळा–कासारवडवली मुंबई मेट्रो लाईन 4 (ग्रीन लाईन) प्रकल्पांतर्गत मुलुंड येथील एलबीएस रोडवर सुरू असलेल्या कामादरम्यान मेट्रोचा स्लॅब कोसळल्याची गंभीर घटना घडली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

सपकाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युती सरकारच्या कारभारातील कथित भ्रष्टाचारामुळेच अशा दुर्घटना घडत आहेत. “लोकवस्तीच्या भागात मेट्रोसारखी मोठी कामे सुरू असताना सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी का होत नाही? निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच, “तथाकथित विकास पुरुष” अशी उपमा देत सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी केली. “फक्त कंत्राटदारांवर कारवाई करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करू नये. जसे श्रेय घेता, तसेच जबाबदारीही घ्यायला शिकले पाहिजे,” असे ते म्हणाले.

सपकाळ यांनी पुढे मुंबई कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि समृद्धी महामार्ग या मोठ्या प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “हजारो-लाखो कोटी रुपये खर्च करूनही जर प्रकल्प जनतेसाठी जीवघेणे ठरत असतील, तर असा विकास कशासाठी?” असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, प्रशासनाकडून दुर्घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत असून, सुरक्षाविषयक बाबींचा सखोल आढावा घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांनीही या घटनेबाबत संताप व्यक्त केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पालघरमध्ये अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात नीलम गोऱ्हे यांची तातडीची भेट; न्यायासाठी ठाम भूमिका

पालघर: पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन आदिवासी मुलीवर भोंदू बाबाकडून झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या…

7 तास ago

अजितदादांच्या कार्याला सलाम! आर्यनसिंह दडियालाचा २१० किमी पोहण्याचा ऐतिहासिक विक्रम

मुंबई: ‘कामाचा माणूस’ म्हणून ओळख असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या कार्याला…

7 तास ago

इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रमाला मंजुरी; येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी

मुंबई: राज्यातील शालेय शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण बदल घडवित, इयत्ता सहावीच्या नवीन अभ्यासक्रम आराखड्याला मंजुरी देण्यात…

11 तास ago

‘हरलो नाही, राजीनामा नाही’ ममता बॅनर्जी ठाम; कालीघाटातून संघर्षाची घोषणा

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठे वळण आले असून Mamata Banerjee यांनी पराभव मान्य…

11 तास ago

एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणर; प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) वतीने सवलतधारक प्रवाशांना NCMC (National Common Mobility Card)…

11 तास ago

Video! रांजणगाव MIDC दहशतीत! कामगारांवर हल्ले आणि लूटमारीचे वाढले प्रमाण…

रांजणगाव (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहत (MIDC) परिसरात परप्रांतीय कामगारांवर हल्ले, लूटमार…

13 तास ago