महाराष्ट्र

मेट्रो स्लॅब दुर्घटनेवरून राजकारण तापले; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: वडाळा–कासारवडवली मुंबई मेट्रो लाईन 4 (ग्रीन लाईन) प्रकल्पांतर्गत मुलुंड येथील एलबीएस रोडवर सुरू असलेल्या कामादरम्यान मेट्रोचा स्लॅब कोसळल्याची गंभीर घटना घडली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

सपकाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, युती सरकारच्या कारभारातील कथित भ्रष्टाचारामुळेच अशा दुर्घटना घडत आहेत. “लोकवस्तीच्या भागात मेट्रोसारखी मोठी कामे सुरू असताना सुरक्षेची काटेकोर अंमलबजावणी का होत नाही? निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे नागरिकांचा जीव धोक्यात येत आहे,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच, “तथाकथित विकास पुरुष” अशी उपमा देत सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारावी, अशी मागणी केली. “फक्त कंत्राटदारांवर कारवाई करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करू नये. जसे श्रेय घेता, तसेच जबाबदारीही घ्यायला शिकले पाहिजे,” असे ते म्हणाले.

सपकाळ यांनी पुढे मुंबई कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि समृद्धी महामार्ग या मोठ्या प्रकल्पांचा उल्लेख करत त्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “हजारो-लाखो कोटी रुपये खर्च करूनही जर प्रकल्प जनतेसाठी जीवघेणे ठरत असतील, तर असा विकास कशासाठी?” असा टोला त्यांनी लगावला.

दरम्यान, प्रशासनाकडून दुर्घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत असून, सुरक्षाविषयक बाबींचा सखोल आढावा घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांनीही या घटनेबाबत संताप व्यक्त केला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील;  सुनेत्रा पवार

रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक; उद्योग प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा; प्रशासनाला…

2 तास ago

सुखबीर बादलांवर हल्ला करणारा जसपालसिंग कोण? पुण्यात वकिली, दोन वर्षांपासून गुरुद्वारात सेवा

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये…

2 तास ago

एका वर्षात हजारो सरकारी शाळा घटल्या; महाराष्ट्रातही ३५७ शाळांना फटका

नवी दिल्ली : देशातील सरकारी प्राथमिक शाळांच्या संख्येत एका वर्षात तब्बल ९,८६६ ने घट झाल्याची…

2 तास ago

महागाईचा भडका; घरखर्चाचे गणित कोलमडले! उत्पन्न जैसे थे, मात्र खर्चाचा आलेख वाढता

नाशिक : महागाईचा वाढता आलेख सर्वसामान्य नागरिकांच्या घरगुती अर्थकारणावर परिणाम करू लागला आहे. किराणा मालासह…

2 तास ago

NCMC स्मार्ट कार्डला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद; १ कोटींहून अधिक नोंदणी

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांसाठी सुरू करण्यात आलेल्या NCMC (National Common…

2 तास ago

शरीर कमजोर झालंय? शेवग्याच्या शेंगांमधल्या कॅल्शियमने पोलादी होतील हाड

शेवगा (Moringa) ही एक कॉमन भाजी आहे. भारतभरातील लोक आवडीने शेवग्याच्या शेंगा खातात. खासकरून साऊथ…

2 तास ago