महाराष्ट्र

माझ्याशी हिंदीत नाही तर मराठीतच बोला; आयएएस अधिकाऱ्यांना सरनाईकांनी ठणकावले

मुंबई: माझ्याशी बोलताना हिंदीत नाही तर मराठीतच बोला, असे भर कार्यक्रमातच परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आयएएस अधिकाऱ्यांना बजावले. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी मैनिक घोष हे हिंदी भाषिक आहेत.

त्यामुळे या दोघांना यापुढे हिंदीत बोलणार असाल तर मी बोलणार नाही. महाराष्ट्र केडर घेऊन जर नोकरी करीत असाल तर राज्यात मराठीत बोलायचे, असे प्रताप सरनाईक यांनी स्पस्ट केले.

राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांच्या उपस्थित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री सरनाईक यांनी एका कार्यक्रमप्रसंगी बोलताना आयएएस अधिकाऱ्यांनी मराठीतच बोलले पाहिजे, असा आग्रह धरला आहे.

आताच मी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार व जिल्हा परिषद कार्यकारी अधिकारी मैनिक घोष यांना सांगितले आहे की, माझ्याशी बोलताना हिंदीत नाही तर मराठीतच बोला. मुंबईला मराठी, हिंदी काय वाद व्हायचा आहे तो होऊ द्या. परंतु आपल्या आयएएस अधिकाऱ्यांनी जर महाराष्ट्र केडर घेतले असेल तर मराठीतच बोलायला हवे. त्यामुळे आपला फायदा होणार नाही, तर त्यांचा फायदा होणार असल्याचे देखील सरनाईक यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, याच वेळी त्यांनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील काही आरोपीना अटक करण्यात आली नसल्याने पालकमंत्री सरनाईक यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात फरार असलेल्या आरोपीना तात्काळ अटक करण्याच्या सूचना केल्या असून त्यासाठी त्यांनी आता पोलीस यंत्रणेला 15 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे.

दरम्यान, कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यास प्रशासनाकडून दिरंगाई केली जात असून जात वैधता प्रमाणपत्र देण्यास विभागातील अधिकारी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत संतप्त झालेल्या मराठी आंदोलकांनी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेल्या पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेराव घातला. आमची अडवणूक केली जात असून तातडीने कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

18 मिनिटे ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

22 मिनिटे ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

25 मिनिटे ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

40 मिनिटे ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

23 तास ago

‘डुबता महाराष्ट्र’ करण्याचे पाप महायुती सरकारचे; जनता माफ करणार नाही;  हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील वाढत्या ड्रग्ज प्रकरणांवरून काँग्रेसने महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन…

23 तास ago