मुंबई: भिवंडी, जिल्हा ठाणे येथे साडेतीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करून साठ हजारात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार १७ नोव्हेंबर २४ रोजी घडला आहे. सदर प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी करून पुढे योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. लहान मुले, महिला, शोषित व वंचित घटकावर होणाऱ्या अत्याचार व त्यांच्या मूलभूत हक्कांचे होत असलेले उल्लंघन याबाबतच्या वाढत्या तक्रारी व त्यांचे निवारण ही एक गंभीर बाब आहे. याबाबतचे सूचना पत्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी प्रधान सचिव गृह विभाग यांना दिले आहे.
NCRB डेटा दर्शवितो की, महिलांची व लहान मुलांची सुरक्षा हे एक आव्हान आहे. या आकडेवारीवर बारकाईने लक्ष ठेवणे, नवीन कल शोधणे आणि कायद्याची अंमलबजावणी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे वरील घटना आणि होणारे इतर गुन्हे यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी प्रकरणात केलेल्या कारवाईबाबत या कार्यालयास अवगत करावी अशी सूचना देखील डॉ.गोर्हे यांनी केली आहे.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…