मुंबई: भिवंडी, जिल्हा ठाणे येथे साडेतीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करून साठ हजारात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार १७ नोव्हेंबर २४ रोजी घडला आहे. सदर प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी करून पुढे योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. लहान मुले, महिला, शोषित व वंचित घटकावर होणाऱ्या अत्याचार व त्यांच्या मूलभूत हक्कांचे होत असलेले उल्लंघन याबाबतच्या वाढत्या तक्रारी व त्यांचे निवारण ही एक गंभीर बाब आहे. याबाबतचे सूचना पत्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी प्रधान सचिव गृह विभाग यांना दिले आहे.
NCRB डेटा दर्शवितो की, महिलांची व लहान मुलांची सुरक्षा हे एक आव्हान आहे. या आकडेवारीवर बारकाईने लक्ष ठेवणे, नवीन कल शोधणे आणि कायद्याची अंमलबजावणी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे वरील घटना आणि होणारे इतर गुन्हे यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी प्रकरणात केलेल्या कारवाईबाबत या कार्यालयास अवगत करावी अशी सूचना देखील डॉ.गोर्हे यांनी केली आहे.
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…
पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…
अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…
मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…
जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…