मुंबई: भिवंडी, जिल्हा ठाणे येथे साडेतीन वर्षांच्या मुलाचे अपहरण करून साठ हजारात विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार १७ नोव्हेंबर २४ रोजी घडला आहे. सदर प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात सखोल चौकशी करून पुढे योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. लहान मुले, महिला, शोषित व वंचित घटकावर होणाऱ्या अत्याचार व त्यांच्या मूलभूत हक्कांचे होत असलेले उल्लंघन याबाबतच्या वाढत्या तक्रारी व त्यांचे निवारण ही एक गंभीर बाब आहे. याबाबतचे सूचना पत्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांनी प्रधान सचिव गृह विभाग यांना दिले आहे.
NCRB डेटा दर्शवितो की, महिलांची व लहान मुलांची सुरक्षा हे एक आव्हान आहे. या आकडेवारीवर बारकाईने लक्ष ठेवणे, नवीन कल शोधणे आणि कायद्याची अंमलबजावणी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे वरील घटना आणि होणारे इतर गुन्हे यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी प्रकरणात केलेल्या कारवाईबाबत या कार्यालयास अवगत करावी अशी सूचना देखील डॉ.गोर्हे यांनी केली आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…
ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…
मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…