मुंबई: आमचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांना आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाला धन्यवाद देत न्यायदेवतेवरील आमचा विश्वास आणखी दृढ झाला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे यांनी दिली आहे.
नवाब मलिक यांचा पक्षाच्या ध्येय धोरणांमध्ये आणि पक्षाच्या वाटचालीत सिंहाचा वाटा राहिला आहे. २००९ – १० पासून नवाब मलिक यांचा आणि माझा जवळचा संबंध आला. त्यावेळी नवाब मलिक हे पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून काम पहात होते. पक्षासाठी त्यांनी जो लढा दिला आहे तो निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. नवाब मलिक ज्या अडचणीतून गेले त्यावर मात करून ते लवकरच कार्यरत होतील, अशी खात्री संजय तटकरे यांनी व्यक्त केली आहे. आम्ही नवाब मलिक यांची आतुरतेने वाट बघत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिडिया सेलला त्यांच्या येण्याने नक्की उभारी मिळेल असा विश्वासही संजय तटकरे यांनी व्यक्त केला.
सराईत गुन्हेगारांचा गावात सशस्त्र धुडगूस; प्रतिबंधक कारवाया कागदावरच राहिल्या का...? शिरूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…
ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…