महाराष्ट्र

कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती; छगन भुजबळ

मुंबई: विधानसभेचे कामकाज सुरू असताना पत्त्यांचा गेम खेळत बसलेल्या कॅबिनेट मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषि खाते काढून घेण्यात आले. अजित पवारांनी पक्षातीलच दत्ता भरणे यांच्याकडे या खात्याची जबाबदारी दिली, तर कोकाटेंकडे आता क्रीडा खाते देण्यात आले आहे. पण, खात्यांच्या या अदलाबदलीबद्दल बोलताना कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी एक गौप्यस्फोट केला.

माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषी खाते काढून घेण्यात आल्याच्या मुद्द्यावर नाशिकमध्ये माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हा निर्णय घेतात. मी अधिक बोलणं योग्य राहणार नाही. याआधी देखील अनेक कृषिमंत्री राहिले आहेत. शरद पवारांनी देशाचे कृषिमंत्री म्हणून काम केलं आहे. त्यामुळे कोणत्याही खात्यात काही अडचण राहत नाही. विरोधकांचे काम आहे आणि त्यामुळे ते राजीनामा मागतात.”

अजित पवारांनी सर्वात आधी मला ऑफर दिली होती; छगन भुजबळ

“कृषिमंत्रिपदाची सर्वात पहिली ऑफर अजित पवारांनी मला दिली होती. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेसोबत सहभागी झाल्यानंतर अजित पवारांनी अर्थ खाते त्यांच्याकडे ठेवले. सर्वात आधी कृषी खात्याची ऑफर मला दिली होती. पण, कृषिमंत्री ग्रामीण भागातील असला पाहिजे, तर जास्त न्याय देऊ शकतो, अशी माझी भूमिका होती. कुठलेही खाते लहान किंवा मोठे नसते. आपण काय काम करतो, त्यावर अवलंबून असते”,असा अप्रत्यक्ष चिमटाही त्यांनी माणिकराव कोकाटेंना काढला.

राष्ट्रवादीत फूट पडून अजित पवारांच्या नेतृत्वाखाली एक गट भाजप-शिंदेंच्या शिवसेना सरकारमध्ये सामील झाला होता. त्यावेळची झालेल्या मंत्रि‍पदाच्या चर्चेबद्दल भुजबळ म्हणाले, “माझ्या समोर सर्व खाती ठेवली होती. मला कृषी खाते घेण्यासाठी आग्रह केला होता. मोठे खाते घेण्यासाठी खूप आग्रह केला गेला. पण, मी ग्रामीण भागातील लोकांना हे खातं द्या असं सांगितलं.”

“दत्ता भरणे कृषिमंत्री पदाला न्याय देतील”

“माझे राजकारण मुंबईत झाले आहे. आम्ही शेतकरी प्रश्नावर मागे उभे राहतो, पण त्याची बारीक सारीक माहिती देणारी माणसे ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे दत्ता भरणे न्याय देतील. बालपणापासून जो ग्रामीण भागात राहिला आहे, तोच जास्त न्याय देऊ शकतो. दत्ता भरणे यांना अडचण येईल असे वाटत नाही”, असेही भुजबळ खातेबदलाबद्दल बोलताना म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

15 तास ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

15 तास ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

16 तास ago

मोदींवर हल्ल्याच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर शिंदेंची टीका

ठाणे: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात भारतातही पंतप्रधान Narendra Modi यांच्यावर…

16 तास ago

वारकरी संप्रदायावर वादग्रस्त वक्तव्य; एकनाथ शिंदे यांचा विकास लवांडे यांना इशारा

मुंबई: राज्यात वारकरी संप्रदायातील कीर्तनकारांबाबत करण्यात आलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या…

16 तास ago

कामगारांवर लोखंडी रॉडने हल्ला; महिलेशी गैरवर्तन

शिरूरमध्ये कामाठीपुरा येथील आश्रमशाळेत खळबळ; सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथील कामाठीपुरा…

16 तास ago