१ ते २१ एप्रिल दरम्यान सुवर्णसंधी
मुंबई: शेतीच्या मालकीहक्कात अडथळा आणणाऱ्या मयत खातेदारांच्या नावांची ७/१२ उताऱ्यावरून नोंद कमी करण्यासाठी मोठा निर्णय. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली १ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबवली जाणार आहे.
या निर्णयामुळे काय फायदा होणार
सातबाऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी होईल.
खरेदी-विक्री व्यवहारात येणारे अडथळे दूर होतील.
शेतीविषयक कर्ज मिळवणे सोपे होईल.
वारसांमध्ये मालकीहक्कासंदर्भातील कायदेशीर वाद टाळता येतील.
महत्त्वाच्या तारखा:
१ ते ५ एप्रिल: तलाठी गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करून चावडी वाचन करतील.
६ ते २० एप्रिल: वारसांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याची संधी.
२१ एप्रिल ते १० मे: ई-फेरफार प्रणालीद्वारे सातबाऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी केली जाईल.
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे:
मृत्यू दाखला
वारस प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र
पोलिस पाटील, सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला
सर्व वारसांची माहिती (नाव, वय, पत्ता, मोबाईल क्रमांक)
रहिवासी पुरावा
संपूर्ण प्रक्रिया मोफत
कोणत्याही दलालाला किंवा अधिकाऱ्याला पैसे देऊ नका! महसूल विभागाने ही मोहीम पूर्णतः *मोफत* असल्याचे जाहीर केले आहे.
प्रशासनाची जबाबदारी:
तहसीलदार: तालुका स्तरावर समन्वय साधतील.
जिल्हाधिकारी: संपूर्ण मोहीम वेळेत पार पडेल याची जबाबदारी सांभाळतील.
विभागीय आयुक्त: राज्यभरातील प्रगतीवर देखरेख ठेवतील.
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…