१ ते २१ एप्रिल दरम्यान सुवर्णसंधी
मुंबई: शेतीच्या मालकीहक्कात अडथळा आणणाऱ्या मयत खातेदारांच्या नावांची ७/१२ उताऱ्यावरून नोंद कमी करण्यासाठी मोठा निर्णय. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली १ एप्रिलपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘जिवंत सातबारा मोहीम’ राबवली जाणार आहे.
या निर्णयामुळे काय फायदा होणार
सातबाऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी होईल.
खरेदी-विक्री व्यवहारात येणारे अडथळे दूर होतील.
शेतीविषयक कर्ज मिळवणे सोपे होईल.
वारसांमध्ये मालकीहक्कासंदर्भातील कायदेशीर वाद टाळता येतील.
महत्त्वाच्या तारखा:
१ ते ५ एप्रिल: तलाठी गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार करून चावडी वाचन करतील.
६ ते २० एप्रिल: वारसांना आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याची संधी.
२१ एप्रिल ते १० मे: ई-फेरफार प्रणालीद्वारे सातबाऱ्यावर वारसांची अधिकृत नोंदणी केली जाईल.
अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे:
मृत्यू दाखला
वारस प्रमाणपत्र किंवा स्वयंघोषणा प्रतिज्ञापत्र
पोलिस पाटील, सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला
सर्व वारसांची माहिती (नाव, वय, पत्ता, मोबाईल क्रमांक)
रहिवासी पुरावा
संपूर्ण प्रक्रिया मोफत
कोणत्याही दलालाला किंवा अधिकाऱ्याला पैसे देऊ नका! महसूल विभागाने ही मोहीम पूर्णतः *मोफत* असल्याचे जाहीर केले आहे.
प्रशासनाची जबाबदारी:
तहसीलदार: तालुका स्तरावर समन्वय साधतील.
जिल्हाधिकारी: संपूर्ण मोहीम वेळेत पार पडेल याची जबाबदारी सांभाळतील.
विभागीय आयुक्त: राज्यभरातील प्रगतीवर देखरेख ठेवतील.
जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…
बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…
मुंबई : राज्यात १ मेपासून जनगणना मोहिमेला सुरुवात झाली असून ही मोहीम दोन टप्प्यांत राबवली…
मुंबई: काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी यशवंत हाप्पे यांच्या स्मरणार्थ दादर येथील टिळक भवनमध्ये शोकसभा आयोजित करण्यात…
मुंबई: राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे आधीच वेशीवर टांगली गेलेली आहेत. राज्यात महिला व लहान मुलीही…
आवडीनुसार पुढील वाटचालीचे आवाहन; मुलींची उत्तीर्णता मुलांपेक्षा 6.35% अधिक मुंबई: उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12…