महाराष्ट्र

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठला युती धर्म पाळत आहेत; आदित्य ठाकरे

मुंबई: कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना पदावरून हटवायला पाहिजे होतं, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठला युती धर्म पाळत आहेत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

आज माध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, गेल्या तीन महिन्यात 750हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ज्या विधानभवनात कृषी खात्याबद्दलच सगळ्यात जास्त चर्चा झाली होती, ज्या विधानभवनात प्रत्येक आमदारांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडल्या त्याच विधानभवनात कृषीमंत्री पत्ते खेळत बसलेले. ही अतिशय दुर्दैवी बाब आहे. आपल्या राज्यात काय सुरु आहे. लातूरमध्ये हाणामारी झाली, त्या लोकांचा तुम्ही राजीनामा घेतलात पण कृषीमंत्र्यांचं काय? याच कृषीमंत्र्यांनी वादग्रस्त विधानं केली होती, तेच विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळत होते. या सरकारमध्ये गांभीर्य आहे की नाही हा प्रश्न आहे. त्यांचा राजीनामा मागण्याची गरजही नव्हती. त्यांना पदावरून काढायला पाहिजे होतं. मुख्यमंत्री असा कुठला युती धर्म पाळत आहेत की त्यांच्यावर कारवाई केली जात नाही असे आदित्य ठाकरे म्हणाले.

कोणाचा डान्स बार असल्याचे समोर आलंय, कुणी विधानपरिषदेत रमी खेळतंय, कुणी हाणामारी करतंय, कुणी कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारतंय, कुणी पैश्यांची बॅग घेऊन बसलंय. पण सरकार कुठेही यांच्यावर कारवाई करत नाहिये. निवडणूक आयोगामुळे तुम्हाला पाशवी बहुमत मिळालंय पण हा माज आणि मस्ती आहे हे दुर्देवी आहे. स्वतःचे 136हून अधिक आमदार असताना हा कुठला युती धर्म आहे. मला आठवतंय की एके काळी आम्ही भाजपसोबत होतो तेव्हा मनमोहन सिंह पंतप्रधान होते. तेव्हा आम्ही त्यांना विचारायचो की तुम्ही आघाडी धर्म का पाळता? भ्रष्टाचारी नेत्यांवर कारवाई करा. आता हीच वेळ देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली आहे असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

2 तास ago

जन्मभूमीतून कर्मभूमीकडे! गोदा ते नर्मदा जलयात्रा; नारीशक्ती आणि विकासाचा नवा महामंत्र

अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…

2 तास ago

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानावरून काँग्रेस आक्रमक

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश…

3 तास ago

गोंधळ’ चित्रपटाचा प्रयोग हाऊसफुल

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत शुक्रवारी…

3 तास ago

बटाटे खाऊन वजन वाढत असं तुम्हालाही वाटतं का जाणून घ्या…

वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय करत असतात. कुणी एक्सरसाईज करतं तर कुणी आहारात बदल…

3 तास ago

च्युइंगम खाल्ल्याने खरंच चेहरा बारीक होतो का जाणून घ्या…

लोकांना नेहमीच त्वचेसंबंधी वेगवेगळ्या समस्या होत असतात. तसेच त्याबाबत काही गैरसमजही लोकांमध्ये असतात. कधी सांगितलं…

3 तास ago