शिरुर (अरुणकुमार मोटे): कवठे येमाई (ता. शिरूर) येथील शेतकरी दत्तात्रय आप्पा पोखरकर यांनी त्यांच्या शेतातील कापणीला आलेले गव्हाचे पिक कापून मळणी करण्यासाठी गव्हाचे पेंढे एका जागेवर ठेवले होते. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने त्याला आग लावून शेतकऱ्याचे 60 हजार रूपयांचे आर्थिक नुकसान केले आहे.
याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि. १९) फेबुवारी रोजी रात्री ११.३० वाजल्याच्या सुमारास कवठे येमाई गावातील शेतजमीन गट नं. ६३१ मध्ये दत्तात्रय पोखरकर यांनी त्यांच्या क्षेत्रामध्ये कापणीला आलेले १ एकर गव्हाचे पिक कापुन मळणीसाठी त्याच्या पेंढया बांधुन एका जागेवर जमा करून ठेवल्या होत्या.
कोणीतरी अज्ञात व्यक्तीने नुकसान करण्याचे उद्देशाने त्या गव्हाच्या जमा करून ठेवलेल्या पेंढया पेटवुन देवुन त्यांच्या गव्हाचे सुमारे ६०,०००/- रू. चे नुकसान केले आहे म्हणून त्यांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द शिरूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस पोलिस हवालदार अनिल आगलावे हे करत आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…
बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…
मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…
ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…
मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…