शिरूर तालुका

राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये मलठणच्या यश जामदारचे घवघवीत यश

शिरुर (अरुणकुमार मोटे): जम्मू काश्मिर येथे (दि. २० ते २१ जून २०२३ रोजी स्टुडण्ड फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.

दिल्ली, हरयाणा, पंजाब, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश अश्या संपूर्ण भारतातील विविध राज्यातील कुस्तीगीर हे या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये मलठण गावचा सुपुत्र पहिलवान यश गणेश जामदार याने महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व करत ५५ किलो वजनी गटात या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. यश जामदार याने उत्कृष्ट आणि नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन करत यशने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.

यश हा आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण येथे प. पू. सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपाछत्र छायेखाली सातत्याने दैनंदिन सराव करत आहे. त्यास आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक NIS, राष्ट्रीय कुस्ती कोच वस्ताद मा. भरत नायकल (सर) तसेच NIS Qualified कोच विवेक नायकल, कुस्ती कोच राजेंद्र पाटील, कुस्ती कोच अक्षय डांगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. यश ने मिळवलेल्या ह्या अभिमानास्पद कामगिरीबद्दल शिरूर तालुक्यासह पुणे जिल्हयातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

8 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

12 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

12 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

12 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

12 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

12 तास ago