क्राईम

विद्यार्थ्यांवर चाकू हल्ला; विक्रम पांचाळ ठार, चार आरोपींना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी

लातूर: लातूर शहरात विद्यार्थ्यांमधील वादातून झालेल्या भीषण चाकूहल्ल्यात एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी अटक केलेल्या चारही आरोपींना मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

मृत विद्यार्थ्याचे नाव विक्रम नारायण पांचाळ (वय २१, रा. कुंभारवाडी, ता. रेणापूर) असे आहे. दुचाकीच्या नुकसानीच्या भरपाईच्या कारणावरून सोमवारी दुपारी फिर्यादी व आरोपी यांच्यात वाद झाला होता. या वादाचा राग मनात धरून आरोपींनी सायंकाळी सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास वसतिगृहाच्या प्रवेशद्वाराजवळ फिर्यादी व त्याच्या मित्रांना गाठले.

या हल्ल्यात केदार महादेव क्षीरसागर (वय १९), श्रीधर तानाजी जाधव (वय २४, दोघेही रा. शिवली, ता. औसा), प्रणव अप्पाराव उदगिरे (वय २०, रा. नळेगाव, ता. चाकूर) आणि सुजल जेजेराव दिंडे (वय १९, रा. दिंडेवाडी, ता. कंधार, जि. नांदेड) यांनी संगनमत करून लाकडी काठ्यांनी मारहाण केली. त्यानंतर श्रीधर जाधव याने चाकूने आदित्य सगरे, सुजल मरे आणि शंतनू परांडे यांच्यावर सपासप वार केले.

दरम्यान, विक्रम पांचाळ याच्या छातीवर व शरीरावर गंभीर वार करण्यात आले. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्याचा प्रतिकार करणाऱ्या इतर तिघा विद्यार्थ्यांनाही गंभीर दुखापत झाली आहे.या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०३(१), १०९(१), ५४ आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अटकेनंतर चाकू जप्त

हल्ल्यानंतर चारही आरोपी पसार झाले होते. मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करत तासाभरात त्यांना अटक केली. आरोपींकडून वापरलेला चाकू जप्त करण्यात आला असून त्यांना मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.

मुख्य आरोपीवर आधीच गुन्हा

अटकेत असलेला आरोपी श्रीधर तानाजी जाधव याच्याविरुद्ध २०२५ मध्ये पुण्यातील भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. तो त्या प्रकरणात जामिनावर बाहेर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.डीवायएसपी समीरसिंह साळवे यांनी सांगितले की, आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात असून प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.या घटनेमुळे लातूर शहरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ठाणे अंतर्गत मेट्रोबाबतचे गैरसमज दूर करा; नागरिकांशी संवाद साधा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महारेलला जनजागृती, चर्चासत्रे आणि तीन आठवड्यांत पर्यायी मार्गाचा अभ्यास करण्याचे निर्देश ठाणे : ठाणे अंतर्गत…

11 तास ago

म्हाडाचे घर देण्याच्या आमिषाने निवृत्त बँक अधिकाऱ्याची 29 लाखांची फसवणूक; शिवाजी पार्क पोलिसांत गुन्हा

सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…

14 तास ago

आज ना उद्या माझा पुतण्या भारताचा पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांबद्दल काकांचा मोठा दावा

'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…

14 तास ago

एफडीएची राज्यभर धडक मोहीम! 88 कारवाया, 9.50 कोटींचा बनावट औषधसाठा जप्त; 10 आरोपी गजाआड

मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…

14 तास ago

ओबीसींच्या हक्कांसाठी काँग्रेसची ‘मंडल यात्रा’; सरकारला वडेट्टीवारांचा इशारा

नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…

14 तास ago

‘इथेनॉल घोटाळ्याप्रकरणी नितीन गडकरींचा राजीनामा घ्या; मोदींनी देशाची माफी मागावी’; हर्षवर्धन सपकाळ

ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…

14 तास ago