क्राईम

विवाहित महिलेवर तीन सख्ख्या भावांचा अत्याचार

संभाजीनगर: चुलीत जाळण्यासाठी जळतन आणण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर तिन सख्ख्या भावांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना २० जून रोजी पारुंडी ता. पैठण येथे घडली असून पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून काल गुरुवारी नितीन बाबासाहेब निसर्गे, संजय बाबासाहेब निसर्गे, विजय बाबासाहेब निसर्गे (सर्व रा. पारुंडी ता. पैठण) या तिन्ही नराधम भावांविरुद्ध ब-ला-त्का-राचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातल्या पारुंडी येथील २२ वर्षीय विवाहिता २० जून रोजी दुपारी गट क्रमांक ७३ मध्ये बांधावर असलेले मोसंबीच्या झाडांचे जळान आणण्यासाठी गेली असता तिथे उभे असलेल्या तिन्ही सख्ख्या भावांनी ति एकटी असल्याचे पाहून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार करून घटनेबाबत घरी सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.

घटनेनंतर पीडिता घरी गेल्यावर घडलेला प्रकार पती व सासूला सांगितला. आपली समाजात बदनामी होईल म्हणून त्यांनी दोन दिवस तक्रार दाखल करण्याचे टाळले. मात्र, काल गुरुवारी सायंकाळी तिघा भावांविरुद्ध अखेर पीडितेने पाचोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पो.नि. संतोष माने, महिला दक्षता व भरोसा सेलच्या सहायक पोलिस निरीक्षक जनाबाई सांगळे यांनी ”in camera” पीडित महिलेचा जवाब नोंदवून तिघा भावांविरुद्ध ब ला त्का राचा गुन्हा दाखल केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

9 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

9 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

9 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

9 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

11 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

11 तास ago