संभाजीनगर: चुलीत जाळण्यासाठी जळतन आणण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर तिन सख्ख्या भावांनी आळीपाळीने अत्याचार केल्याची घटना २० जून रोजी पारुंडी ता. पैठण येथे घडली असून पोलिसांनी पीडित महिलेच्या तक्रारीवरून काल गुरुवारी नितीन बाबासाहेब निसर्गे, संजय बाबासाहेब निसर्गे, विजय बाबासाहेब निसर्गे (सर्व रा. पारुंडी ता. पैठण) या तिन्ही नराधम भावांविरुद्ध ब-ला-त्का-राचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, पैठण तालुक्यातल्या पारुंडी येथील २२ वर्षीय विवाहिता २० जून रोजी दुपारी गट क्रमांक ७३ मध्ये बांधावर असलेले मोसंबीच्या झाडांचे जळान आणण्यासाठी गेली असता तिथे उभे असलेल्या तिन्ही सख्ख्या भावांनी ति एकटी असल्याचे पाहून तिच्यावर आळीपाळीने अत्याचार करून घटनेबाबत घरी सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.
घटनेनंतर पीडिता घरी गेल्यावर घडलेला प्रकार पती व सासूला सांगितला. आपली समाजात बदनामी होईल म्हणून त्यांनी दोन दिवस तक्रार दाखल करण्याचे टाळले. मात्र, काल गुरुवारी सायंकाळी तिघा भावांविरुद्ध अखेर पीडितेने पाचोड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. सहायक पो.नि. संतोष माने, महिला दक्षता व भरोसा सेलच्या सहायक पोलिस निरीक्षक जनाबाई सांगळे यांनी ”in camera” पीडित महिलेचा जवाब नोंदवून तिघा भावांविरुद्ध ब ला त्का राचा गुन्हा दाखल केला.
पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…
नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…