शिरुर (अरुणकुमार मोटे) मलठण (ता.शिरुर) येथील शिंदेवाडी येथे रविवार (दि २८) रोजी खंडोबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत सुरु असताना बैलगाडा घाटातच भानुदास ज्ञानोबा शिंदे, ज्ञानोबा गोविंद शिंदे व संजय रखमा शिंदे या स्थानिक नागरीकांमध्ये पुर्वीच्या हाणामारीच्या वादातुन अचानक भांडण होऊन तुंबळ हाणामारी झाली. बैलगाडा घाटात झालेल्या मारहाणीत संजय रखमा शिंदे (वय अंदाजे ३५) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर शिरुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. रात्री १० च्या सुमारास उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
शिंदेवाडी येथील स्थानिक भाविकीतील दोन कुटुंबात ही वादावादी झाली. त्यामुळे बैलगाडा शर्यती तातडीने बंद करण्यात आल्या. पुर्वीच्या हाणामारीच्या वादातुन त्यांच्यात कायम शिवीगाळ होत होती. या भांडणाचा बैलगाडा शर्यतीशी कुठलाही संबंध नसल्याचे यात्रा कमिटीकडून सांगण्यात आले आहे. या खुन प्रकरणी भानुदास ज्ञानोबा शिंदे, ज्ञानोबा गोविंद शिंदे यांच्यावर शिरुर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून शिरुर पोलिस अधिक तपास करत आहेत.
सध्या बेट भागात गावोगावी यात्रा-जत्रा सुरू असून बैलगाडा शर्यत, तमाशा हे यात्रेचे मुख्य आकर्षण बनले आहे. बंद झालेल्या शर्यती सुरु झाल्यापासुन बैलगाडा प्रेमी प्रत्येक यात्रेतील शर्यतीत सहभाग नोंदवत आहेत. बेट भागातील टाकळी हाजी येथील कुडांवर सर्वात मोठी यात्रा भरते. ही यात्रा दोन दिवसावर आली असून प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्याची मागणी होत आहे.
ग्रामीण भागात यात्रे दरम्यान किरकोळ वादावरुन राग मनात ठेवून हाणामारी होत आहे. अशा प्रकारे तंटे, हाणामारी झाल्यास यात्रा बंद होऊ शकते. त्याठिकाणी पुन्हा बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळत नाही. तसेच संवेदनशील गावांमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी नागरीकांमधुन होत आहे.
शिंदेवाडी येथे बैलगाडा प्रेमींची निराशा;भांडण झाल्याने शर्यती अर्ध्यातच बंद; एकजण गंभीर जखमी
तळेगाव-न्हावरे रोडवर नियंत्रण सुटल्याने भरधाव कार उलटली; दोघे जण गंभीर जखमी
भीषण अपघात; लोणीकंद-थेऊर रस्त्यावर अपघातात दोघांची प्रकृती चिंताजनक तर पाच जण जखमी
शिक्रापुर येथे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या अल्पवयीन युवतीचा विनयभंग
तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा…
पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…
बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…