जीव जाताच आरोपीने केला मृतदेहाजवळ जल्लोष…
औरंगाबाद: पुन्हा ‘सैराट’ चित्रपटाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली असून, 3 वर्षापूर्वी बहिणीला पळवून नेऊन लग्न करणाऱ्या तरुणावर भर रस्त्यात कुऱ्हाडीचे वार करून हत्या केल्याची घटना उघडीस आली असून औरंगाबाद जिल्ह्यात दोन दिवसांत दोन खून झाल्यामुळे औरंगाबाद जिल्हा हादरला आहे. बापू खिल्लारे (वय 30) असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तीन वर्षांपूर्वी बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून भावाने औरंगाबाद पुणे महामार्गावरील दहेगाव बंगला जवळ इसारवाडी फाटा येथे बहिणीच्या पतीची भर रस्त्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करुन ही निर्घृण हत्या केली आहे.
खून करुन आरोपीने केला जल्लोष
संतापजनक म्हणजे कुऱ्हाडीने वार केल्यानंतर बहिणीच्या पतीचा जीव गेल्याची आरोपीने खात्री केली आणि त्यानंतर रस्त्यावरच जल्लोष केल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शी नागरिकांनी दिली आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली
काही तासातच आरोपी ‘ प्रिन्स ‘ ला ठोकल्या बेड्या
याप्रकरणी वाळूज पोलिसांनी अवघ्या दोनच तासात गतीने चक्र फिरवून आरोपीला नेवासा परिसरातून ताब्यात घेतले; त्याने गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड कोठे टाकली याचा शोध वाळूज पोलिस रात्री उशिरा पर्यंत घेत आहे अशी माहिती पोनि सचिन इंगोले यांनी दिली.
मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…
मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…
मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…
नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…