जीव जाताच आरोपीने केला मृतदेहाजवळ जल्लोष…
औरंगाबाद: पुन्हा ‘सैराट’ चित्रपटाची पुनरावृत्ती पाहायला मिळाली असून, 3 वर्षापूर्वी बहिणीला पळवून नेऊन लग्न करणाऱ्या तरुणावर भर रस्त्यात कुऱ्हाडीचे वार करून हत्या केल्याची घटना उघडीस आली असून औरंगाबाद जिल्ह्यात दोन दिवसांत दोन खून झाल्यामुळे औरंगाबाद जिल्हा हादरला आहे. बापू खिल्लारे (वय 30) असे मृत युवकाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तीन वर्षांपूर्वी बहिणीला पळवून नेल्याचा राग मनात धरून भावाने औरंगाबाद पुणे महामार्गावरील दहेगाव बंगला जवळ इसारवाडी फाटा येथे बहिणीच्या पतीची भर रस्त्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करुन ही निर्घृण हत्या केली आहे.
खून करुन आरोपीने केला जल्लोष
संतापजनक म्हणजे कुऱ्हाडीने वार केल्यानंतर बहिणीच्या पतीचा जीव गेल्याची आरोपीने खात्री केली आणि त्यानंतर रस्त्यावरच जल्लोष केल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शी नागरिकांनी दिली आहे. सदरील घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली
काही तासातच आरोपी ‘ प्रिन्स ‘ ला ठोकल्या बेड्या
याप्रकरणी वाळूज पोलिसांनी अवघ्या दोनच तासात गतीने चक्र फिरवून आरोपीला नेवासा परिसरातून ताब्यात घेतले; त्याने गुन्ह्यात वापरलेली कुऱ्हाड कोठे टाकली याचा शोध वाळूज पोलिस रात्री उशिरा पर्यंत घेत आहे अशी माहिती पोनि सचिन इंगोले यांनी दिली.
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…
रांजणगाव गणपती (तेजस फडके): ता. शिरुर तालुक्यात असणाऱ्या रांजणगाव एमआयडीसीतील ब्रिटानिया कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या…
मुंबई: भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणव्यवस्था ही केवळ पदवी देणारी नसून विचारक्षम, कौशल्यसंपन्न आणि मूल्याधिष्ठित नागरिक…
पेपरफुटी ही केवळ कायद्याची किंवा प्रशासनाची समस्या नसून, ती लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांशी आणि देशाच्या भविष्यासोबत…