शेतकऱ्याच्या नावावरून बँकेचे कर्ज काढून पन्नास लाखांची फसवणूक
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील शेतकरी सचिन बाळासाहेब गरुड यांच्या जमिनीवरून सहकारी संस्थेतून कर्ज काढून, प्रत्यक्ष कर्जदारास रक्कम न देता संगनमताने लाखोंची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात माजी आमदार अशोक कोंडीबा टेकवडे यांच्यासह एकूण अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२०१९ मध्ये व्यवसाय वाढीसाठी सचिन गरुड व त्यांच्या दोन मित्रांनी अजित मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी, सासवड व अजित नागरी सहकारी पतसंस्था, सासवड येथे कर्जाची मागणी केली होती. त्यासाठी त्यांच्या गणेगाव दुमाला येथील शेतीची जमीन गहाण ठेवण्यात आली. बँकेने अनेक कागदपत्रे घेतली व वेळोवेळी आश्वासन देत टाळाटाळ केली.
शेवटी कर्ज मंजूर झाले असे दाखवून ६५ लाख रुपयांची रक्कम नोंदवली गेली. मात्र प्रत्यक्षात कर्जदारांना एकाही रुपयाचा लाभ न देता बँक व्यवस्थापक व संस्थापकांनी संगनमताने ती रक्कम स्वतःच्या खात्यात वळवून घेतल्याचे उघड झाले.कर्ज रक्कम मिळाली नाही, तरी २०२३ मध्ये अचानक सचिन गरुड यांच्या नावावर थकबाकीची नोटीस आली. त्यानंतर तहसील कार्यालयात चौकशी केल्यावर संपूर्ण घोटाळा उघड झाला.
याबाबत सचिन गरुड यांनी शिरूर न्यायालयात दावा दाखल केला. न्यायालयाने सुनावणीनंतर सदर प्रकरणी आरोपींवर गुन्हा नोंदविण्याचे आदेश दिले. त्यानुसार शिरूर पोलिसांनी माजी आमदार अशोक टेकवडे, दिलीप वाल्हेकर, बाळासाहेब काळे, अजिंक्य टेकवडे, विजया टेकवडे, दिनेश घोणे, भूषण गायकवाड, सतीश जाधव, प्रदीप जगताप व गणेश जगताप (सर्व रा. सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश कदम करीत आहेत. दरम्यान या कारवाईमुळे शेतकरी व कर्जदारांमध्ये संतापाचे वातावरण असून, सहकारी संस्थांवर विश्वासाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…