महाराष्ट्र

विश्वासाशिवाय कॉरिडॉर नाही; विकासासोबत वारकऱ्यांची सेवा आणि शेतकऱ्यांचा सन्मान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर: आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यानिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर कॉरिडॉर, शक्तिपीठ महामार्ग, वारकरी सुविधा आणि विविध राजकीय मुद्द्यांवर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली. विकास प्रकल्प राबविताना कोणावरही अन्याय होणार नाही आणि संबंधितांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही काम केले जाणार नाही, अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.

पंढरपूर कॉरिडॉरबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, वाढत्या वारकरी संख्येमुळे भविष्यातील गरजा लक्षात घेऊन नियोजन आवश्यक आहे. मात्र, शेतकरी, स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांच्या भावना व हित अबाधित ठेवूनच हा प्रकल्प पुढे नेला जाईल. कोणत्याही प्रकारची जबरदस्ती केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आषाढी एकादशीच्या दिवशी कॉरिडॉरविरोधात आंदोलनाची भूमिका घेण्यात आली होती. मात्र, विठ्ठलाच्या दर्शनाचा आणि वारीचा पवित्र सोहळा लक्षात घेऊन आंदोलन टाळण्याची विनंती संबंधितांना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी आवश्यकतेनुसार आरोग्य शिबिरांची संख्या वाढविण्यात येणार असून आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्यमंत्र्यांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रभागा नदीतील पाणी व्यवस्थापनासह वारकऱ्यांना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

शक्तिपीठ महामार्गावरील विरोधाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, समृद्धी महामार्गालाही सुरुवातीला विरोध झाला होता. मात्र, त्याचे फायदे दिसल्यानंतर विरोध कमी झाला. स्थानिकांच्या अडचणी लक्षात घेऊन आवश्यक ठिकाणी अलाइनमेंटमध्ये बदल करण्याचाही विचार सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या रामरक्षा आंदोलनावर टीका करताना शिंदे म्हणाले, “ही रामाची नव्हे, तर स्वतःच्या पक्षाची रक्षा करण्याची धडपड आहे.”

नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या कथित मारहाण प्रकरणावर बोलताना त्यांनी कोणत्याही प्रकारच्या हिंसेचे समर्थन नसल्याचे स्पष्ट केले आणि न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करण्याचे आवाहन केले.

विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राच्या समृद्धीसाठी प्रार्थना केल्याचे सांगत, “बळीराजा सुखी राहो, चांगला पाऊस पडो आणि सरकारच्या तिजोरीवर पहिला हक्क बळीराजाचाच आहे,” असे नमूद केले.

यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार प्रा. ज्योती वाघमारे, आमदार तानाजी सावंत, आमदार समाधान अवताडे, आमदार राजू खरे, आमदार अभिजित पाटील, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे, शिवसेना संपर्क प्रमुख महेश नाना साठे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

2 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

2 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

2 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

2 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

2 तास ago

अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण करू नका; सुनेत्रा पवारांचा विरोधकांना इशारा

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी अजित पवारांच्या अपघाताच्या मुद्द्यावरून…

3 तास ago