शिरूर (अरुणकुमार मोटे): पावसाळा सुरू होत आहे. यामुळे नदीवरील बंधाऱ्यातील ढापे काढून ठेवण्यात आले होते. आज शनिवार (दि. १७) रोजी पहाटे एक -दीडच्या सुमारास हे ढापे चार-पाच जणांनी टेम्पोमध्ये भरून चोरी करुन घेऊन जात होते.
अचानक नाथा शंकर निचित यांच्याकडे मजुरी करत असणाऱ्या मजुरास जाग आली. बाहेर काहीतरी वाजते याचा कानोसा घेत नाथा निचित यांना फोन केला. दोघेजण बंधाऱ्याचे डावीकडून ढापे ठेवलेल्या ठिकाणी आले असता ढापे कमी झालेले दिसले. त्यांनी ताबडतोब तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष निचित यांना फोन करून सदरची घटना कळवली. तंटामुक्ती अध्यक्षांनी तातडीने पोलिसांना फोन केला.
ग्रामपंचायत सदस्य नवनाथ निचित यांच्या मदतीने गाडीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. तर गाडी कोणत्या दिशेने गेली हे न समजल्याने घटनास्थळी जाऊन गाडीच्या टायरच्या खुनाचा मागवा घेत त्यांनी गाडीचा पाठलाग केला. त्याचवेळी उपसरपंच विक्रम निचित यांना फोन केला. व CCTV कॅमेरे चेक करण्यास सांगितले व आजूबाजूच्या गावातील नागरिकांना फोन करून सतर्क करण्यास सांगितले.
दरम्यान पंचतळे या ठिकाणी पोलिसांची रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करणारी गाडी होती. सदरचा टेम्पो जांबुतच्या दिशेने जात होता तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष निचित, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ निचित, नाथा निचित, संतोष थोरे हे गाडीचा पाठलाग करत होते. समोरून पोलीस व पाठीमागून ग्रामस्थ यामुळे चोरांनी गाडी ब्रिटानियाच्या डेअरीकडे वळवली. परंतु समोरच पांडाशेठ जगताप उभे होते. चोरट्यांचा जगताप यांना धमकावत पळ काढला. पांडाशेठ यांनी गाडी ड्रायव्हर ला पकडून ठेवले. पोलीस आणि ग्रामस्थ तिथे पोहचले व टेम्पो पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान ग्रामस्थांच्या सतर्कतेने चोर व टेम्पो पकडले गेला. त्यामुळे हे चोर पकडणाऱ्या ग्रामस्थांचे जांबुत, वडनेर, टाकळी हाजी परीसरातील नागरीकांच्या वतीने कौतुक होत आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर धनंजय थेऊरकर व त्यांचे सहकारी करत आहे.
नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…
मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…
खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…