शिरूर (अरुणकुमार मोटे): पावसाळा सुरू होत आहे. यामुळे नदीवरील बंधाऱ्यातील ढापे काढून ठेवण्यात आले होते. आज शनिवार (दि. १७) रोजी पहाटे एक -दीडच्या सुमारास हे ढापे चार-पाच जणांनी टेम्पोमध्ये भरून चोरी करुन घेऊन जात होते.
अचानक नाथा शंकर निचित यांच्याकडे मजुरी करत असणाऱ्या मजुरास जाग आली. बाहेर काहीतरी वाजते याचा कानोसा घेत नाथा निचित यांना फोन केला. दोघेजण बंधाऱ्याचे डावीकडून ढापे ठेवलेल्या ठिकाणी आले असता ढापे कमी झालेले दिसले. त्यांनी ताबडतोब तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष निचित यांना फोन करून सदरची घटना कळवली. तंटामुक्ती अध्यक्षांनी तातडीने पोलिसांना फोन केला.
ग्रामपंचायत सदस्य नवनाथ निचित यांच्या मदतीने गाडीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. तर गाडी कोणत्या दिशेने गेली हे न समजल्याने घटनास्थळी जाऊन गाडीच्या टायरच्या खुनाचा मागवा घेत त्यांनी गाडीचा पाठलाग केला. त्याचवेळी उपसरपंच विक्रम निचित यांना फोन केला. व CCTV कॅमेरे चेक करण्यास सांगितले व आजूबाजूच्या गावातील नागरिकांना फोन करून सतर्क करण्यास सांगितले.
दरम्यान पंचतळे या ठिकाणी पोलिसांची रात्रीच्या वेळी पेट्रोलिंग करणारी गाडी होती. सदरचा टेम्पो जांबुतच्या दिशेने जात होता तंटामुक्तीचे अध्यक्ष संतोष निचित, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ निचित, नाथा निचित, संतोष थोरे हे गाडीचा पाठलाग करत होते. समोरून पोलीस व पाठीमागून ग्रामस्थ यामुळे चोरांनी गाडी ब्रिटानियाच्या डेअरीकडे वळवली. परंतु समोरच पांडाशेठ जगताप उभे होते. चोरट्यांचा जगताप यांना धमकावत पळ काढला. पांडाशेठ यांनी गाडी ड्रायव्हर ला पकडून ठेवले. पोलीस आणि ग्रामस्थ तिथे पोहचले व टेम्पो पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.
दरम्यान ग्रामस्थांच्या सतर्कतेने चोर व टेम्पो पकडले गेला. त्यामुळे हे चोर पकडणाऱ्या ग्रामस्थांचे जांबुत, वडनेर, टाकळी हाजी परीसरातील नागरीकांच्या वतीने कौतुक होत आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर धनंजय थेऊरकर व त्यांचे सहकारी करत आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…