नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार
मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून आणि देशभर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे राजकीय अजेंडा असल्याच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत, “अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या आडून भाजप-आरएसएसनेच २०१४ मध्ये आपला राजकीय अजेंडा राबवला होता. त्यामुळेच आज विद्यार्थ्यांच्या आंदोलनातही त्यांना अजेंडा दिसतो,” असा पलटवार सपकाळ यांनी केला.
सपकाळ म्हणाले की, नीट परीक्षा आणि सीबीएसईच्या कारभारामुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची राखरांगोळी झाली असून देशभर विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. अशा वेळी आंदोलनाला बदनाम करण्याऐवजी सरकारने आपल्या अपयशाची जबाबदारी स्वीकारावी.
विद्यार्थ्यांवरील पोलिसांच्या कारवाईचाही त्यांनी निषेध केला. “दिल्लीत विद्यार्थ्यांना जनावरांसारखी मारहाण करण्यात आली. अल्पवयीन विद्यार्थ्यांनाही सोडले नाही, मुलींशी गैरवर्तन झाले. या अमानुष लाठीहल्ल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थन करतात का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
भाजप सरकारवर टीका करताना सपकाळ म्हणाले की, सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांना देशद्रोही, आंदोलनजीवी किंवा इतर शिक्के मारण्याची भाजपची जुनी पद्धत आहे. मात्र, काँग्रेस विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर थेट रस्त्यावर उतरून लढत राहील. राहुल गांधी यांनी ‘छात्रों की गुंज’ अभियानाद्वारे हा मुद्दा सर्वप्रथम उचलला असून, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी काँग्रेसचा संघर्ष पुढेही सुरू राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…
शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…
मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…
खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…
पावसामुळे खड्ड्यांत साचले पाणी; वाहनचालक त्रस्त, तातडीच्या दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी पाबळ (सुनिल जिते): पाबळ–कन्हेरसर हा…