क्राईम

बाप कसला हैवानच तो! 22 पानांची चिठ्ठी लिहून बहीण भावाची आत्महत्या, आमच्या बॉडीला हात लावू नका…

गाझीयाबाद: भाऊ आणि बहिणीने एकत्र आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. गाझियाबादमध्ये ही भयंकर घटना समोर आली आहे. या प्रकरणाला आता एक नवीन वळण आलं आहे. आपलं जीवन संपवण्यापूर्वी बहीण अंजलीने डायरीच्या 22 पानांवर ही सुसाईड नोट लिहिली होती.

अंजलीने लिहिले आहे की आमच्या मृत्यूला मिस रितू (सावत्र आई) आणि सुखवीर सिंग (वडील) वगळता दुसरे कोणीही जबाबदार नाही. महिम (मित्र) माझ्या खात्यातील पैसे आणि पीएफचा मालक असेल आणि मिस रितू आणि सुखवीर सिंग यांनी माझ्या चितेला हात लावू नये. फक्त महिम मला मुखाग्नी देईल. अंजलीने सुसाईड नोटच्या पानांचा फोटो तिचे वडील सुखवीर सिंग, सावत्र आई, मामा अनिल सिंग आणि मामी रेखा राणी यांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवले आहे.

या सुसाईड नोटमध्ये अंजलीने लिहिले की, सामाजिक रीतिरिवाज आणि आपल्या शानसाठी तिचे वडील सुखवीर सिंग आणि आई रितू तिला मानसिक त्रास देतात. रितू देवीच्या हुशारीसमोर सुखवीर सिंग यांना कुठलेली स्पष्टीकरण देण्याचा काही अर्थ नाही. कारण, वडील सावत्र आईवर विश्वास ठेवतात. बाबा, एखाद्या मुलाला फक्त जन्म देणे आणि शाळेची फी भरणेच नाही तर त्याच्यासोबत वेळ घालवणे, त्याच्या इच्छा पूर्ण करणे देखील आवश्यक आहे. माझ्या भावाला कठोर परिश्रम करून सरकारी नोकरी मिळाली. त्याचे इतके शोषण झाले आहे की तो त्याच्या मित्रांसोबत बाहेरही जाऊ शकत नाही. सुखवीर सिंग, मला तुम्हाला बाबा म्हणायलाही आवडत नाही. तुम्हाला माझ्या मृतदेहाला स्पर्श करण्याचा अधिकार नाही. तुम्ही तुमच्या दुसऱ्या लग्नासाठी तुमच्या स्वतःच्या मुलांच्या आनंदाचा गळा दाबला आहे. तुमच्या पत्नीचे अभिनंदन.

आईविना जगणे दुर्दैवी आहे. तुम्ही लोक नातेवाईक आहात पण आजपर्यंत तुम्हाला आमच्या स्थितीबद्दल माहिती नाही, असं तिने मामा देवेंद्र आणि मामा अनिल यांना उद्देशून लिहिलं आहे.

पुढे अंजलीने लिहिलं की, तिच्या सावत्र आईने तिच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित केले, तिची बदनामी केली आणि माझे वडील गप्प राहिले, त्यांनी माझं ऐकलं नाही. काही लोक म्हणतील की मी वाईट आहे आणि मी माझ्या पालकांबद्दल अशा गोष्टी लिहित आहे. मला माहित आहे की मी माझ्या सावत्र आईसोबत 16 वर्षे कशी घालवली आहेत. माझ्या भावालाही त्याचे दुःख आहे.

तिने तिच्या सावत्र आईला इशारा देत म्हटलं की, मला तुमच्या फसवणुकीची आणि हुशारीची जाणीव आहे. म्हणून डायरीत लिहिलेली ही पाने फाडू नका. कारण मी त्यांचा फोटो काढून अनेक लोकांना पाठवला आहे. तुमची हुशारी पकडली जाईल. जर मी एकटीच मेली असती तर माझ्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असते. आम्ही दोघेही भाऊ आणि बहीण मानसिक तणावाखाली आहोत. आता समाजात मान उंचावून जगून दाखवा.

महिम, आता सगळं तुझ्या हातात आहे. मी आता हे जग सोडून जात आहे. तू फक्त माझे अंतिम संस्कार कर, माझ्या आई-वडिलांना आणि इतरांना मृतदेहाला स्पर्श करू देऊ नकोस. तू माझा हितचिंतक आहेस, मी तुला काहीतरी भेट देऊ इच्छिते. तू माझ्या खात्यातील सर्व पैसे ठेव, हा माझा छोटासा आधार आहे. दुसऱ्या खात्यातील पैसे H-352 घरात राहणाऱ्या लोकांना देशील आणि माझी पॉलिसीही दे. बाकी सर्व तुमचे आहे. घरातला वाद मी सहन करू शकत नाही.

महिम अंजलीचा ग्राफिक डिझायनर मित्र आहे आणि दोघेही भागीदारीत काम करतात. अंजली अनेक वर्षांपासून नोएडाच्या रॅनविक एक्सपोर्ट कंपनीत टीम लीडर म्हणून काम करत होती.

मामा देवेंद्र यांनी कवीनगर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार केली आहे. अविनाश आणि अंजलीची आई कमलेश यांचाही विषारी पदार्थ खाऊन मृत्यू झाल्याचा आरोप देवेंद्र सिंह यांनी केला आहे. अविनाशच्या मृत्यूच्या एक वर्षानंतर, त्यांच्या भावोजीने त्यांच्या प्रेयसीशी लग्न केले आणि तिला घरी आणले. त्यांनी अविनाश आणि अंजलीचे शोषण करण्यास सुरुवात केली. या गोष्टीला कंटाळून दोन्ही भावंडे इंदिरापुरम येथील त्यांच्या मावशीच्या घरी गेली आणि तिथे राहू लागली. देवेंद्र सिंह यांनी कवीनगर पोलिस ठाण्यात मृतकाच्या वडिलांवर आणि सावत्र आईवर त्यांच्या पुतण्या आणि भाचीला जीव देण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे; करड्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गुन्हेगारी घटनांचा आलेख सातत्याने वाढत असतानाच करडे गावात घडलेल्या गोळीबाराच्या…

7 तास ago

दिवंगत अजितदादा पवारांना अभिवादन; विधानमंडळाची स्मृतीपत्रे सुनेत्रा अजित पवार यांच्या स्वाधीन.

बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक आणि राजकीय कार्याचा गौरव करत महाराष्ट्र विधानपरिषद…

17 तास ago

२०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य; ‘देवगिरी ते देवराई’ अभियानाचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई: राज्य शासनाने २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट निश्चित केले असून, यंदाच्या…

17 तास ago

पिंपळे जगतापच्या पाषाण तलावात तरुणाचा मृतदेह; LCB सह विविध तपास पथके घटनास्थळी

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे): शिरुर तालुक्यातील पिंपळे जगताप येथील पाषाण तलावात एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून…

17 तास ago

‘ईशान सेतू’ने महाराष्ट्र-ईशान्य भारत जोडला; मणिपूरमध्ये सिद्धिविनायकाची प्रतिकृती उभारणार; एकनाथ शिंदे

ईशान्य भारतातील भाषांमध्ये रामायण, गीता, हनुमान चालीसाचे प्रकाशन; पवित्र ग्रंथांच्या मोफत वितरणाचा खर्च उचलण्याची शिंदेंची…

17 तास ago

मोदींनी सोनम वांगचुकांची भेट का घेतली नाही?; राम मंदिर चोरीवर भाजप-आरएसएसवर सपकाळांचा हल्लाबोल

मुंबई: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केंद्र सरकार, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक…

17 तास ago