मनोरंजन

खऱ्या लग्नाच्या संकटातून सुटण्यासाठी तारिणी-केदारची नवी चाल; प्रोमोने वाढवली उत्सुकता

मुंबई: टीव्हीवर दिसणाऱ्या काही जोड्या प्रेक्षकांच्या विशेष लाडक्या ठरतात. सिद्धू-भावना, स्वानंदी-समर, सावली-सारंग, मीरा-अथर्व यांसारख्याच तारिणी मालिकेतील तारिणी आणि केदार ही जोडी सध्या प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. झी मराठी वाहिनीवरील ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत आपले स्थान टिकवून ठेवत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे.

मालिकेत तारिणी ही स्पेशल क्राइम युनिटची प्रमुख असून समाजात घडणाऱ्या गुन्ह्यांचा तपास करून गुन्हेगारांना अद्दल घडवण्याचे काम ही टीम करते. विशेष म्हणजे हे युनिट पडद्यामागे राहून काम करत असल्याने त्यांच्या कार्यपद्धतीबाबत सर्वसामान्यांना फारशी माहिती नसते. याच टीममध्ये केदारही महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

सध्या एका प्रकरणाच्या तपासासाठी तारिणी आणि केदार खांडेकर कुटुंबात पती-पत्नी म्हणून राहत आहेत. सुरुवातीला त्यांनी लग्न केल्याचे सांगितल्यावर सर्वांनाच धक्का बसला होता. मात्र प्रत्यक्षात त्यांनी लग्न केलेले नसून ते केवळ तपासाचा भाग आहे. आता खांडेकर कुटुंब त्यांच्या लग्नाचा खरा सोहळा लावून देणार असल्याचे समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे.

प्रोमोमध्ये कौशिकी तारिणीला त्यांच्या पुन्हा लग्नाचा विचार सांगते. त्यावर तारिणी स्पष्ट शब्दांत नकार देत, “मी या लग्नाला तयार नाही; सारखी सारखी तीच चूक केली तर ती घोडचूक होते,” असे म्हणते. यानंतर केदार भावनिक होत, “तुझ्यावर प्रेम करण्यात कुठे कमी पडलो गं?” असा सवाल करतो. पुढे दोघांमध्ये जोरदार वाद होताना दिसतो. मात्र हे भांडण खऱ्या लग्नापासून सुटण्यासाठी केलेले नाटक असल्याचे संकेत प्रोमोमध्ये मिळतात.

वाहिनीने हा प्रोमो शेअर करताना “खऱ्या लग्नाच्या संकटातून स्वत:ला सोडविण्यासाठी तारिणी-केदारची नवी चाल” अशी कॅप्शन दिली आहे. त्यामुळे पुढील भागात नेमके काय घडणार, तारिणी-केदारची योजना यशस्वी होणार का, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवसेनेचा आत्मा मराठमोळ्या, रांगड्या आणि सेवाभावी शिवसैनिकातच!

मुंबई: शिवसेना ही केवळ एक राजकीय संघटना नाही, तर लाखो शिवसैनिकांच्या त्याग, निष्ठा आणि जनसेवेच्या…

1 तास ago

CJP ची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; अभिजीत दीपके राष्ट्रीय संयोजक, सौरव दास-आशुतोष रांका सहसंयोजक

मुंबई : CJP (कॉकरोच जनता पार्टी) ने आपल्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली आहे. पक्षाचे संस्थापक…

4 तास ago

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

18 तास ago

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन…

18 तास ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

21 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

21 तास ago