महाराष्ट्र

ब्रह्मपुरीत विजय वडेट्टीवारांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा विराट जनआक्रोश मोर्चा; भाजप सरकारवर घणाघाती हल्लाबोल

महागाई, बेरोजगारी, शेतकरी प्रश्न, लाडकी बहीण योजना आणि स्मार्ट मीटरवरून सरकारवर टीका; तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन

ब्रह्मपुरी: केंद्र आणि राज्य सरकारच्या कथित जनविरोधी धोरणांविरोधात काँग्रेसतर्फे ब्रह्मपुरी येथे काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली विराट जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज क्रीडांगण येथून निघालेल्या या मोर्चात हजारो नागरिक, महिला, युवक, शेतकरी, कामगार तसेच काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. सरकारविरोधी घोषणांनी शहर दणाणून गेले.

मोर्चाला संबोधित करताना विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांची सुरक्षा, स्मार्ट मीटर, लाडकी बहीण योजना, कर्जमाफी आणि धान उत्पादकांना बोनस न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करत सरकार जनतेच्या अपेक्षांवर अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला.

गोसेखुर्द प्रकल्पासाठी काँग्रेस सरकारच्या काळात मोठा निधी मंजूर करण्यात आला होता, मात्र सध्याच्या सरकारकडून विकासकामांना गती मिळत नसल्याचा आरोपही त्यांनी केला. समृद्धी महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी सुपीक शेती कमी मोबदल्यात संपादित करण्याचा प्रयत्न होत असून, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस लढा सुरू ठेवेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर टीका करत हजारो शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच जंतर-मंतरवरील युवकांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत जनतेचा रोष आगामी काळात सरकारला महागात पडेल, असा इशाराही त्यांनी दिला.

युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांनीही सरकारच्या धोरणांवर टीका करत अन्यायाविरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. मोर्चाच्या समारोपानंतर तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. महागाई नियंत्रणात आणणे, बेरोजगारांना रोजगार, शेतकऱ्यांना हमीभाव, महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना आणि सर्वसामान्यांवरील आर्थिक भार कमी करण्याच्या मागण्या निवेदनात करण्यात आल्या.

या मोर्चामुळे ब्रह्मपुरीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, काँग्रेसने सरकारविरोधातील जनतेचा आवाज बुलंद करण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमाला युवक काँग्रेस प्रदेश सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष विश्वजीत कोवासे, खेमराज तिडके, हितेंद्र राऊत, प्रभाकर सेलोकर, राजेश कांबळे, प्रमोद चिमुरकर, योगेश मिसार, डॉ. नितीन उराडे, थानेश्वर कायरकर, सोनू नाकतोडे यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आधी तरुणांची माफी मागा, मग संवाद साधा; मोहन भागवतांवर काँग्रेसचा निशाणा

मुंबई: पेपरफुटी आणि शिक्षण व्यवस्थेतील बदलांच्या मागणीसाठी झालेल्या देशव्यापी आंदोलनावरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि राष्ट्रीय…

28 मिनिटे ago

व्यायाम व योगा करण्याचे फायदे

1) व्यायाम केल्याने सुदृढ दीर्घायुष्य लाभते व्यायाम करणारी व्यक्ती तुलनेने अधिक काळ जगते कारण व्यायामामुळे…

4 तास ago

चयापचय बिघडण्याची कारणे

झोप पूर्ण न होणे आणि शांत झोप न लागणे यामुळे इन्सुलिन आणि कोर्टिसोल सारख्या हार्मोन्सचे…

4 तास ago

छत्रपती संभाजीनगरच्या विकास प्रकल्पांना गती; भूसंपादनासाठी ३० खासगी भूमापकांची नियुक्ती

ऑरिक, ग्रीनफील्ड रस्ता, विमानतळ विस्तार आणि रेल्वे दुहेरीकरणाच्या कामांना मिळणार वेग; नागरिकांच्या जमीन मोजणीची प्रतीक्षाही…

4 तास ago

‘गुंगी गुडिया’ वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा आक्रमक; मुंबईत काँग्रेसविरोधात मूक आंदोलन.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याविरोधात काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवर…

4 तास ago

NEET आंदोलनावरील कारवाईच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे मुंबईत बॅनर आंदोलन; अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी

मुंबई: NEET पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलिस कारवाईच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसने वांद्रे…

4 तास ago