मुख्य बातम्या

एक जानेवारीचा कार्यक्रम सुयोग्य नियोजनात पार पडेल; डॉ. राजेश देशमुख

जिल्हाधिकाऱ्यांकडून शिक्रापुरातील पार्किंगच्या जागेसह आदी पाहणी

शिक्रापूर (शेरखान शेख): एक जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे होणाऱ्या शौर्य दिनाची तयारी प्रसासनाने सुरु केलेली असून प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे 1 जानेवारी रोजी होणारा शौर्यदिनाचा कार्यक्रम शांततेत व सुयोग्य नियोजनात पार पडेल असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी २०१८ रोजी झालेल्या दंगली नंतर प्रशासनाने योग्य खबरदारी घेतलेली असताना प्रत्येक वर्षी प्रशासनाकडून या कार्यक्रमाची विशेष तयारी करण्यात येत असते. काही ठिकाणी स्वतंत्र पार्किंग करुन तेथे वाहने लावून स्वतंत्र बसेसची व्यवस्था करण्यात येत असताना या वर्षी मोठ्या प्रमाणात समाजबांधव येण्याची शक्यता असल्याने काही ठिकाणी पार्किंग देखील वाढवण्यात आलेले असताना शिक्रापूर येथील पार्किंगची नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पाहणी केली. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस अधीक्षक अंकित गोयल, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांसह आदी अधिकारी उपस्थित होते.

याबाबत बोलताना एक जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात समाज बांधव विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. यावर्षीच्या 1 जानेवारीच्या कार्यक्रमाचे नियोजन आधी पासून सुरु केलेले असून पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी, यांसह अनेक अधिकाऱ्यांच्या बैठका झालेल्या आहेत. या वर्षी मोठ्या प्रमाणात अनुयायी येण्याची शक्यता असल्याने पार्किंगच्या जागा वाढवण्यात आलेल्या आहेत. तसेच पिण्याचे पाणी, बसेस, आरोग्य विभाग यांच्या संख्या देखील वाढवण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण तसेच पोलीस आयुक्त पुणे शहर हे देखील याबाबत योग्य नियोजन करत आहेत. त्यामुळे यावर्षीचा देखील कार्यक्रम शांततेत व सुयोग्य नियोजनात पार पडेल असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

झोपडपट्टीमुक्त मुंबई हवी, पण माणूसमुक्त नव्हे; SRA-MHADAच्या माध्यमातून परवडणाऱ्या घरांचा मार्ग

मुंबई : मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. रोजगार, व्यवसाय आणि चांगल्या आयुष्याच्या अपेक्षेने…

6 मिनिटे ago

चाकणच्या रस्त्यांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत मैदानात; १६ ऑगस्टला उद्योजकांसोबत बैठक

चाकण: चाकण औद्योगिक वसाहतीतील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असून, यामुळे उद्योग महाराष्ट्राबाहेर किंवा राज्यातील…

14 मिनिटे ago

‘आदिवासींच्या हक्काचा पैसा जातो कुठे?’; आश्रमशाळांच्या कारभारावर वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात

नागपूर: आश्रमशाळांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना आवश्यक सुविधा मिळत नसतील, त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असेल आणि…

19 मिनिटे ago

कुर्ला भूस्खलन दुर्घटना : बाधित कुटुंबांना ४ लाखांची मदत; कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी सचिन अहिर आक्रमक

मुंबई : कुर्ल्यातील चिराग नगर परिसरातील गौशिया चाळीजवळ मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण भूस्खलनाच्या दुर्घटनेत ६…

14 तास ago

१,२३१ अनुदानित महाविद्यालयांचे कामकाज आता डिजिटल; ‘ई-ऑफिस प्रणाली’चे लोकार्पण

मुंबई : राज्यातील अशासकीय अनुदानित महाविद्यालयांचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक आणि कागदरहित करण्यासाठी सुरू…

14 तास ago

विद्यार्थ्यांच्या सूचनांचे चंद्रकांत पाटलांकडून स्वागत; परीक्षा सुरक्षेसह सामाजिक प्रश्नांवर थेट संवाद

मुंबई : उच्च शिक्षणातील विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी…

14 तास ago