शिरूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालत, शिरूर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने एका सराईत मोटारसायकल चोरट्याला अटक करत तब्बल पाच गुन्ह्यांचा छडा लावण्यात यश मिळवले आहे. या कारवाईने शहरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला आहे.
दिनांक १५ मे २०२५ रोजी रात्री ८ ते १६ मे सकाळी ६ दरम्यान, शिरूर गावातील गुजरमळा येथील डॉ. राम मगर यांच्या बांधकाम साइटवरून ६५,००० रुपयांचे लोखंडी साहित्य अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याच्या घटनेनंतर शिरूर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला होता. या घटनेच्या तपासासाठी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण व त्यांच्या गुन्हे शोध पथकाने शिरूर शहरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांच्या माहितीद्वारे कारवाई करत आर्यन एअरपोस पवार (रा. शिंदेवाडी, आष्टापूर, सध्या रा. शिरूर) याला ताब्यात घेतले. अटक केल्यानंतर पोलिस चौकशीत आरोपीने आपला साथीदार रोहित भोसले (रा. पाण्याच्या टाकीजवळ, शिरूर) याच्यासोबत मिळून मे महिन्यात शिरूर शहरातून चार मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली आहे.
सर्व गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, चारही मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत. या यशस्वी कारवाईसाठी शिरूर पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील पोसई शुभम चव्हाण, पोलीस हवालदार नाथसाहेब जगताप, अक्षय कळमकर, अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, सचिन भोई, निखील रावडे, रवि काळे, रविंद्र आव्हाड, अजय पाटील यांचे विशेष योगदान आहे. या कारवाईचे पोलीस अधीक्षक संदीप गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी कौतुक करत पुढील तपास अधिक काटेकोर करण्याचे निर्देश दिले आहेत. शहरातील चोऱ्यांच्या सत्राला ब्रेक लावणाऱ्या या कार्यवाहीने शिरूर पोलिसांनी पुन्हा एकदा नागरिकांचा विश्वास संपादन केला आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…