शिरुर (तेजस फडके) शरद पवार हे राजकारणाचा ५० वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले जेष्ठ नेते आहेत. त्यामुळे अशा नेत्यांनी संयमाने वागायच असत व पराभव स्वीकारायचा असतो. शरद पवारांनी जनतेचा कौल मान्य करावा. लोकांचं ऐकावं, कार्यकर्ते व खोटं सांगणाऱ्या नेत्यांचं ऐकू नये असा सल्ला राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना दिला.
शिरुर तालुक्याच्या बेट भागातील टाकळी हाजी येथे आज रविवार (दि ८) रोजी सुद्रिक यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त आशिर्वाद देण्यासाठी राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. फडणवीस म्हणाले, बबनराव सुद्रिक आणि त्यांच्या कुटुंबाचे व माझे चांगले संबंध आहेत. एका वाईट घटनेनंतर त्यांच्या कुटुंबाच्या पाठीशी आम्ही सर्वजण राहिलो. त्यामुळे जवळीकता झाली आहे. त्यांच्या घरातील विवाहसोहळ्यानिमित्त त्यांच आमंत्रण आल्यानंतर मी त्यांना विवाहाला नक्की येईल असे सांगितले होते. त्यामुळे मी आशीर्वाद देण्यासाठी आलो होतो. यावेळी आमदार प्रविण दरेकर तसेच माजी आमदार राम शिंदे हे सुद्धा उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, पराभव का झाला हे पवार साहेबांना महिती आहे. परंतु कार्यकर्त्यांच्या दबावावाखाली शरद पवार वागत असतील तर अशान सर्वसामान्य लोकांचा लोकशाहीवरील विश्वास उडेल. लोकशाही प्रक्रियेवरील लोकांचा विश्वास उठेल अशी कार्यवाही किमान शरद पवार यांनी करु नये.
यावेळी पत्रकारांनी अबू आझमी व सपा भाजपाची ‘बी टीम’ आहे असा आरोप माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला होता असा प्रश्न विचारला. परंतु यावर बोलण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी टाळले.
शिरूर! फायनान्स कंपनीच्या आरेरावीला कंटाळून उचलले आत्महत्येचे पाऊल
शिरूर! बिडी पिताना लुंगीवर पडल्याने अन् होरपळून मृत्यू
शिरूर शहरात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीची तरुणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…