कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन (Ranjangaon MIDC Police) हद्दीत शेतकऱ्यांचे पशुधन चोरणाऱ्या दोघांपैकी एकाला पोलिसांनी मुद्दे मालासह अटक केली. तर पोलिसांची चाहूल लागताच एकजण फरार झाला आहे.
रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही दिवसांपुर्वी शेतकऱ्यांच्या गोठ्यामधुन जनावरे चोरीच्या घटना घडल्याने शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतीला जोडधंदा म्हणून शेतकरी गाई, म्हैस पालन करुन दुग्ध व्यवसाय करतात. त्यामुळे दुध देणारी जनावरे चोरीचा प्रकार हा शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर दुष्परीणाम करणारी घटना असल्याने सदर घटनेचे गांभीर्य ओळखत रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी आरोपीचा तपास पथकाच्या मदतीने शोध घेण्याचे काम सुरु केले होते.
दि २२ डिसेंबर २०२४ रोजी मध्यरात्री रांजणगावच्या हद्दीतील लांडेवस्ती, सोनेसांगवी रोडलगत राहणारे शेतकरी रमेश तबन खेडकर (वय ७२) यांच्या गोठ्यातील पंढरपुरी जातीच्या दोन म्हैस चोरीस गेल्या होत्या. सदर प्रकरणी अज्ञात आरोपीविरुध्द दि. २९ डिसेंबर २०२३ रोजी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील आरोपीचा व चोरीस गेलेल्या म्हशींचा शोध घेण्यासाठी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी तपास पथकातील सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, योगेश गुंड यांना सुचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हा घडलेल्या परीसरातील व रांजणगाव, कोंढापुरी, कासारी फाटा, तळेगाव ढमढेरे, आष्टापुर, मलठण, कवठे येमाई, शिंगवे पारगाव, नारायणगाव, ओझर, बनकरफाटा, सरळगाव, मुरबाड इ. भागातील रोडवरील एकुण १५० ते २०० सीसीटिव्हि (CCTV) कॅमेऱ्यातील व्हिडीओ फुटेज तपासुन आरोपी हे सदर गुन्हयातील म्हशी या त्यांच्याकडील पिकअप गाडीमधुन (कळंबाड, ता. मुरबाड, जि.ठाणे) येथे गेले असल्याचे निदर्शनास आले.
या परिसरामध्ये तपास पथकातील दत्तात्रय शिंदे, उमेश कुतवळ व तपासी अंमलदार पोलिस हवालदार विजय सरजिने यांनी जावुन शोध घेतला असता त्यांना त्या ठिकाणावरील एका गोठ्यामध्ये चोरीस गेलेल्या म्हशी दिसुन आल्या असता सदरच्या म्हशी फिर्यादी यांनी पाहिल्यानंतर ओळखल्या. त्यानंतर तपास पथकासह सदर ठिकाणी अचानक छापा टाकला असता आरोपी १)पद्ममाकर उर्फ नागेश शांताराम मोरे (वय २३) रा. कळंबाड, जिल्हा परीषद शाळेजवळ, ता. मुरबाड, जि.ठाणे याला ताब्यात घेण्यात आले असुन दुसरा आरोपी पोलीसांची चाहुल लागल्याने पळुन गेला आहे. पळुन गेलेल्या आरोपीचे नाव २) नरेश भाऊ मोरे रा. कळंबाड, जिल्हा परीषद शाळेजवळ, ता. मुरबाड, जि.ठाणे असे असल्याने निष्पन्न झाले आहे.
रांजणगाव पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीकडुन चोरीस गेलेल्या २ तसेच इतर ठिकाणावरुन चोरलेल्या ३ अशा एकुण ५ म्हशी व गुन्हयात वापरलेला महिंद्रा कंपनीचा पिकअप गाडी क्र. एम एच ०५ डि के २७६१ असा एकुण ७ लाख ४० हजार किंमतीच्या ५ म्हशी व पिकअप गाडी जप्त करण्यात आलेली आहे. ताब्यात घेण्यात आलेला आरोपी पद्मामाकर शांताराम मोरे याला दि ६ जानेवारी २०२५ रोजी रात्री १०:४० वाजता अटक करण्यात आलेली असुन त्याला शिरुर न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने आरोपीला दि ९ जानेवारी २०२५ पर्यंत पोलीस कोठडी मंजुर केली आहे.
या गुन्ह्यातील फरार आरोपी नरेश मोरे हा सराईत गुन्हेगार असुन त्याच्याविरुध्द घरफोडी, चोरी, जनावरे चोरी सारखे ठाणे ग्रामीण जिल्ह्यातील टोकावडे व मुरबाड पोलीस ठाण्यात एकुण ८ गुन्हे दाखल आहेत. या गुन्हयातील अटक आरोपीकडुन रांजणगाव, शिरुर व पारगाव पोलीस स्टेशन हद्दीतील एकुण ४ जनावर चोरीचे गुन्हे उघडकीस आले असुन या आरोपीनी पोलीस स्टेशन हद्दीत तसेच इतर भागात अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता असल्याने त्याबाबत अधिक सखोल तपास सुरु आहे. सदर गुन्ह्यातील म्हैस मालक व परिसरातील शेतकरी यांनी गुन्हे उघडकिस आल्याने समाधान व्यक्त केले आहे.
सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, पुण्याचे अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगावचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, योगेश गुंड, पोलिस हवालदार विजय सरजिने, विलास आंबेकर यांनी केली आहे. सदर गुन्हयांचा पुढील अधिक तपास विजय सरजिने हे करत आहेत.
शिरूर! बिबटयाच्या हल्ल्यात दहा बकऱ्या आणि घोडा ठार
शिरूरमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्याला तलवार लावून लुटणाऱ्याला शिरूर पोलिसांनी केले जेरबंद
रांजणगाव पोलिसांनी कारेगावातील ‘कोयता गँग’ च्या २४ तासाच्या आत आवळल्या मुसक्या
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…