मुख्य बातम्या

जि. प.माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांचा अखेर जामीन मंजूर…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : ईडीच्या जेलमध्ये असणारे बहुचर्चित व्यक्तीमत्व पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य समिती सभापती मंगलदास बांदल यांना सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे आता आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या राजकारणाची समीकरणे बदलणार आहे.

पीएमएलए कोर्टाचे न्यायाधीश मिलिंद जाधव यांनी बांदल याना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे मंगलदास बांदल हे सहा महिन्यानंतर कारागृहाबाहेर येणार आहेत त्यामुळे शिरूर तालुक्यातील राजकारणात पुन्हा एकदा मंगलदास बांदल खळबळ उडून देणार का? याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

दरम्यान, ईडीने २१ ऑगस्ट २०२४ रोजी मंगलदास बांदल यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडी येथील निवासस्थानी कारवाई करीत साडेपाच कोटी रुपये जप्त केले होते. तसेच बांदल यांच्या ८५ कोटी किंमतीच्या मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे. मनीलॉडरींगसह अनेक गुन्हे बांदल यांच्यावर दाखल करण्यात आले होते. यापूर्वीही शिवाजीनगर बँक घोटाळा प्रकरणी बांदल यांनी २१ महिने तुरुंगवास भोगला आहे. त्यानंतर ईडीने अटक केल्याने बांदल हे सहा महिन्यांपासून कारावास भोगत आहेत. आता जमीन मंजूर झाल्याने त्यांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

१२ मार्च सायंकाळी पर्यंत ते जेलमधून बाहेर येतील असे त्यांच्या निकटवर्ती यांनी सांगितले आहे. तर शिरूर तालुका हवेली तालुक्यामध्ये असणारे पैलवान मंगलदास बांदल यांचे समर्थक यांच्यामध्ये उत्साह दिसून आला. विधानसभा निवडणुकीनंतर मंगलदास बांदल यांचा जामीन होईल अशी चर्चा सर्वत्र होती. त्याप्रमाणे जामीन झाला आहे. एकूणच आगामी काळामध्ये मंगलदास बांदल हे आपली ताकद अजमावतील हे नक्की.

मंगलदास बांदल यांच्या घरावर ईडीचा छापा, कोट्यवधींची मालमत्ता जप्त…

मंगलदास बांदल यांच्या पत्नी आणि भावालाही ईडीने चौकशीला बोलावलं; ईडीच्या कोठडीत अजुन आठ दिवस बांदलाचा मुक्काम

मंगलदास बांदल यांच्या घरावर पुन्हा ईडीची धाड

मंगलदास बांदल यांना ईडीने केली अटक; कोट्यवधींचं घबाड

मंगलदास बांदल यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट; चर्चांना उधाण

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

11 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

11 तास ago

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी अनिवार्य? राज्य सरकारचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई: राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत प्रवाशांशी अधिक प्रभावी संवाद साधण्यासाठी मराठी भाषेला प्राधान्य देण्याच्या दिशेने महाराष्ट्र…

11 तास ago

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी…

13 तास ago

‘गोंधळ’ चित्रपटाचे प्रदर्शन; सिनेप्रेमींना खास संधी

मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…

1 दिवस ago

हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…

1 दिवस ago