शिरूर (अरुणकुमार मोटे): संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण दादा गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचा शिरूर शहरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. शहरातील विविध सामाजिक, राजकीय व मराठा संघटनांनी तहसील कार्यालयावर धडक देत तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांना निवेदन सादर केले. या घटनेतील हल्लेखोर अद्याप मोकाट असून, त्यांच्या मुसक्या आवळून कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
या वेळी माजी आमदार पोपटराव गावडे, लोकशाही क्रांती आघाडीचे अध्यक्ष रवींद्र धनक, अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा सरचिटणीस भास्कर पुंड, तालुकाध्यक्ष श्यामकांत वर्पे, जनता दलाचे जिल्हाध्यक्ष संजय बारवकर, माजी उपसरपंच संभाजी कर्डिले, नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती राजेंद्र जाधवराव, घोडगंगा कारखान्याचे माजी संचालक राजेंद्र गावडे, संभाजी ब्रिगेडचे सुदाम कोलते, सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डिले, रूपाली बोर्डे, राधा घेगडे, सकल मराठा समाज संघाचे विश्वस्त रामभाऊ इंगळे, प्रा. चंद्रकांत धापटे, माजी नगरसेवक विनोद भालेराव, काँग्रेस (आय) चे अजीम सय्यद, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, मोहम्मद हुसेन पटेल, बबनराव गायकवाड आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी रवींद्र धनक यांनी भाषणात सांगितले की, “प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला दुर्दैवी असून, अशा घटनांनी महाराष्ट्रातील विचारमंथनाची परंपरा डागळते. दोषींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई झाली पाहिजे.”
पोपटराव गावडे, राजेंद्र गावडे, मंगेश खांडरे, विनोद भालेराव, राणी कर्डिले, संजय बारवकर, भास्कर पुंड आदींनी आपले विचार मांडत, प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ शासनाने गंभीर भूमिका घेतली पाहिजे, अशी जोरदार भूमिका मांडली.
निवेदनात म्हटले आहे की, “विचारांची लढाई ही विचारांनीच व्हायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीतून सामाजिक परिवर्तन घडवले गेले आहे. अशा विचारवंतांवर हात उचलणे ही समाजविघातक प्रवृत्ती असून ती अजिबात सहन केली जाणार नाही.”निवेदनाच्या अखेरीस असेही नमूद करण्यात आले की, हल्ल्याचा सूत्रधार अद्याप मोकाट फिरत आहे, हे शासनाचे अपयश दर्शवते. त्यामुळे अशा असहिष्णु प्रवृत्तींवर तात्काळ आणि कठोर कारवाई करून प्रवीण गायकवाड यांना न्याय द्यावा.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…