हिवाळ्यात ऑफिसात मन लागत नाही, तर घरी करमत नाही. ही समस्या प्रत्येकालाच भेडसावत असते. ‘काम धेलाभरचं नाही आणि रिकामपण कवडीभरचं नाही’ अशीच गत झाली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कारण भविष्यात ही समस्या कायमची डोके दुखी होऊ शकते. त्यावर वेळेतच उपाययोजना करणे आवश्यक आहे. थंडी जशी जशी वाढते, तसा आळस वाढत असतो. हा आळस म्हणजेच थकवा असतो. शारीरिक व मानसिक अशा दोन प्रकारे थकवा असतो. आराम करून शारीरिक थकान चटकन आपण घालवू शकतो. मात्र मानसिक थकवा घालविण्यासाठी खूप अवधी लागतो. थकवा हा कोणत्या प्रकारचा आहे, हे कळत नाही. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होत असते. मात्र हा थकावा कशामुळे आला आहे, त्यावर उपाययोजना करणे हे आवश्यक असते.
झोप लवकर का लागते
जास्त प्रमाणात अंग मेहनत करणे, व्यायाम करणे.
झोप पूर्ण न होणे.
अधिक तनावात राहणे.
शरीरात रक्त कमी असणे, अशक्तपणा.
शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असणे.
थकव्याची लक्षणे
हिवाळ्यात अधिक थकवा येत असल्याने उत्साह कमी होतो. त्यामुळे थकव्याची लक्षणे ओळखून त्यावर उपाययोजना केली पाहिजे.
कामात मन न लागणे. नकारात्मक विचारामध्ये वाढ होणे.
अशक्तपणा येणे, दिवसरात्र झोप लागणे.
थकवा दूर करण्याचे उपाय
हिवाळयात उन्हात उभे राहिल्याने शरीरात स्फूर्ति येत असते. थकवाही हळू हळू कमी होत असतो.
हाताच्या दोन बोटांनी चेहर्यावर हलकीशी मालिश करावी. तसे केल्याने रक्त प्रवाह सुरळीत होतो. तसेच मन व शरीरावरील ताण कमी होतो.
सुगंधित तेलाने शरीराची मालिश केल्यानेही थकवा दूर केला जातो.
दररोज योग अथवा व्यायाम करावा, मात्र अति व्यायाम केल्याने ही थकवा येतो.
किमान ७ ते ८ तासांची झोप आवश्यक आहे.
तनावमुक्त राहण्याचा नेहमी प्रयत्न करावा.
(सोशल मीडियावरून साभार)
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…