आरोग्य

टाचदुखीची कारणे व काही घरगुती उपाय…

टाचदुखीची कारणे व काही घरगुती उपाय…

हा एक वातविकार आहे. वेळीच काळजी घ्या.

कारणे

१) नियमित पोट साफ न होणे.

२) जड अन्नपदार्थ जास्तच खाणे.

३) घाईघाईने जेवणे.

उपाय

१) एक लहान चमचा मेथी दाणे + पाणी सकाळी व संध्याकाळी घ्या.

२) लिंबाची एक फोड सालीसह चावून चावून खा.

३) हातापायाचे तळवे मागून व पुढून प्रेस करा. लवकर गुण येतो. रीकाम्यापोटी सकाळसंध्याकाळ करा.

४) कोमटच पाणी प्या.

५) पोट साफ ठेवा. त्यासाठी त्रिफळा चूर्ण घ्या. किंवा एरंडेल तेल रात्री कोमट पाण्यातून घेणे.

६) हलका आहार घ्या.

७) टाचेला श्वास रोखून तेल लावून माँलिश करा. श्वास सोडल्यावर माँलिश थांबवा. नंतर पुन्हा श्वास रोखून माँलिश करा. असे ५/१० वेळा करा. रिकाम्या पोटीच करा.

८) रिकाम्या पोटी काहीवेळ श्वास रोखून टाचेवर चाला.

९) नियमित प्राणायाम करा.

१०) आवळा पदार्थ खा.

पायाच्या टाच दुखीवर घरगुती उपाय

टाचदुखी कशामुळे होते? 

बहुतांश प्रकरणी पायातील उतींचा एक पट्टा, ज्याला “प्लांटर फेशिया‘ असे म्हणतात, त्याचे नुकसान झाले किंवा तो घट्ट झाला की टाचदुखी होते. प्लांटर फेशिया हा ऊतींचा एक कडक आणि लवचिक पट्टा असतो, जो पायाच्या तळव्याखालून जातो. तो टाचेच्या हाडाला पायाच्या हाडांशी जोडतो आणि पायासाठी शॉक ऍब्सॉर्बर म्हणून कार्य करतो. या प्लांटर फेशियाचे नुकसान होऊन आतमध्ये लहान फटी (मायक्रो टियर्स) विकसित होऊ शकतात. यामुळे प्लांटर फेशिया घट्ट होऊ शकतो आणि टाचदुखी जडते. अशा वेळी आजूबाजूची ऊती आणि टाचेचे हाड यांचादेखील काही वेळेस दाह होऊ शकतो. प्लांटर फॅसायटीस हे टाचदुखीचे सर्वांत सामान्य कारण आहे.

काही सोपे उपाय

१) खड़े मीठ गरम पाण्यात टाकुन टाचा शेकाव्यात.

२) टाचदुखी हा वाताचा प्रकार आहे. होमिओपथिच्या गोळ्या घ्याव्यात

३) मऊ चपला मिळतात त्या वापराव्या.

४) फिजिओ थेरेपीचे काही सोपे एकसरसाइज जसे भिंतीला हात टेकून उभे रहायचे अणि पायाच्या बोटानी टाचा वर उचलून जागच्या जागेवर जॉगिंग करायच.

५) जमिनीवर टॉवेल पसरून पाय त्यावर ठेवून पायाच्या बोटा नी टॉवेल जवळ आणायचा.

६) टाचेवर बिब्बा घालून पहा.

७) रुईचे पान व विटेचा तुकडा गरम करून त्याने टाचा शेकणे.

८) गोडे तेलात मीठ घालून फेटावे व रात्री टाचेला लावून प्लास्टिकचा कागद बांधून झोपावे.

९) पाण्याची pet.वाटली पाणी भरून फ्रिजर मधे ठेवली. पूर्णपणे. बर्फ झाल्यावर पायाखाली ठेवुन पाय पुढे मागे करत रहावे.सुरवातीला खुपच गार वाटते पण मग बरे वाटु लागते .असे साधारण ५ १०मिनिटे करावे. असे दिवसातुन २ ३वेळा करावे. दुसर्‍या दिवशी बराच फरक वाटेल.असे ३-४ दिवस केल्यावर खुपच फरक पडलेला जाणवेल.

१०) बर्फाच्या शेकाने स्नायूंना आलेली सूज जाते व त्यामुळे बरे वाटते.

११) योग्य प्रकारची पादत्राणे वापरणे देखील महत्त्वाचे आहे. शक्‍यतो, आपण आपल्या पायाचे बाक आणि टाचा यांना आधार आणि मऊपणा देणाऱ्या कमी ते मध्यम टाचेची पादत्राणे घालावीत. टाचा नसलेले शूज घालणे टाळावे. स्पंजची गादी असलेली पादत्राणे वापरावीत.

१२) शक्य तेवढी विश्रांती घ्यावी. पाय सरळ व थोडा उंच करुन ठेवावा. बर्फाचा शेक घ्यावा.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डॉ. नीलम गोऱ्हे यांची विधानपरिषदेत बिनविरोध निवड; शिंदेंचा विश्वास सार्थ ठरवण्याचा निर्धार

मुंबई: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकीत शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.…

3 तास ago

पाणी पिताना केलेल्या ३ चुका पडतात महागात

पाणी केवळ तहान भागवत नाही तर, शरीराला अनेक व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स प्रधान करते. त्वचा, डोळे,…

4 तास ago

हाय ब्लड प्रेशरला हलक्यात घ्याल तर होईल पश्चाताप

बरेच लोक इतर आजारांच्या तुलनेत हाय ब्लड प्रेशरला फार गंभीरतेने घेत नाहीत. ही एक सामान्य…

4 तास ago

शिरूर शहरात वारंवार वीज खंडित; रोहित्रांची क्षमता वाढविण्याची नागरिकांची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील मारुती आळी, सरदार पेठ तसेच रामलिंग रोड परिसरात गेल्या काही…

4 तास ago

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

18 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

18 तास ago