आरोग्य

टाचदुखीची कारणे व काही घरगुती उपाय…

टाचदुखीची कारणे व काही घरगुती उपाय…

हा एक वातविकार आहे. वेळीच काळजी घ्या.

कारणे

१) नियमित पोट साफ न होणे.

२) जड अन्नपदार्थ जास्तच खाणे.

३) घाईघाईने जेवणे.

उपाय

१) एक लहान चमचा मेथी दाणे + पाणी सकाळी व संध्याकाळी घ्या.

२) लिंबाची एक फोड सालीसह चावून चावून खा.

३) हातापायाचे तळवे मागून व पुढून प्रेस करा. लवकर गुण येतो. रीकाम्यापोटी सकाळसंध्याकाळ करा.

४) कोमटच पाणी प्या.

५) पोट साफ ठेवा. त्यासाठी त्रिफळा चूर्ण घ्या. किंवा एरंडेल तेल रात्री कोमट पाण्यातून घेणे.

६) हलका आहार घ्या.

७) टाचेला श्वास रोखून तेल लावून माँलिश करा. श्वास सोडल्यावर माँलिश थांबवा. नंतर पुन्हा श्वास रोखून माँलिश करा. असे ५/१० वेळा करा. रिकाम्या पोटीच करा.

८) रिकाम्या पोटी काहीवेळ श्वास रोखून टाचेवर चाला.

९) नियमित प्राणायाम करा.

१०) आवळा पदार्थ खा.

पायाच्या टाच दुखीवर घरगुती उपाय

टाचदुखी कशामुळे होते? 

बहुतांश प्रकरणी पायातील उतींचा एक पट्टा, ज्याला “प्लांटर फेशिया‘ असे म्हणतात, त्याचे नुकसान झाले किंवा तो घट्ट झाला की टाचदुखी होते. प्लांटर फेशिया हा ऊतींचा एक कडक आणि लवचिक पट्टा असतो, जो पायाच्या तळव्याखालून जातो. तो टाचेच्या हाडाला पायाच्या हाडांशी जोडतो आणि पायासाठी शॉक ऍब्सॉर्बर म्हणून कार्य करतो. या प्लांटर फेशियाचे नुकसान होऊन आतमध्ये लहान फटी (मायक्रो टियर्स) विकसित होऊ शकतात. यामुळे प्लांटर फेशिया घट्ट होऊ शकतो आणि टाचदुखी जडते. अशा वेळी आजूबाजूची ऊती आणि टाचेचे हाड यांचादेखील काही वेळेस दाह होऊ शकतो. प्लांटर फॅसायटीस हे टाचदुखीचे सर्वांत सामान्य कारण आहे.

काही सोपे उपाय

१) खड़े मीठ गरम पाण्यात टाकुन टाचा शेकाव्यात.

२) टाचदुखी हा वाताचा प्रकार आहे. होमिओपथिच्या गोळ्या घ्याव्यात

३) मऊ चपला मिळतात त्या वापराव्या.

४) फिजिओ थेरेपीचे काही सोपे एकसरसाइज जसे भिंतीला हात टेकून उभे रहायचे अणि पायाच्या बोटानी टाचा वर उचलून जागच्या जागेवर जॉगिंग करायच.

५) जमिनीवर टॉवेल पसरून पाय त्यावर ठेवून पायाच्या बोटा नी टॉवेल जवळ आणायचा.

६) टाचेवर बिब्बा घालून पहा.

७) रुईचे पान व विटेचा तुकडा गरम करून त्याने टाचा शेकणे.

८) गोडे तेलात मीठ घालून फेटावे व रात्री टाचेला लावून प्लास्टिकचा कागद बांधून झोपावे.

९) पाण्याची pet.वाटली पाणी भरून फ्रिजर मधे ठेवली. पूर्णपणे. बर्फ झाल्यावर पायाखाली ठेवुन पाय पुढे मागे करत रहावे.सुरवातीला खुपच गार वाटते पण मग बरे वाटु लागते .असे साधारण ५ १०मिनिटे करावे. असे दिवसातुन २ ३वेळा करावे. दुसर्‍या दिवशी बराच फरक वाटेल.असे ३-४ दिवस केल्यावर खुपच फरक पडलेला जाणवेल.

१०) बर्फाच्या शेकाने स्नायूंना आलेली सूज जाते व त्यामुळे बरे वाटते.

११) योग्य प्रकारची पादत्राणे वापरणे देखील महत्त्वाचे आहे. शक्‍यतो, आपण आपल्या पायाचे बाक आणि टाचा यांना आधार आणि मऊपणा देणाऱ्या कमी ते मध्यम टाचेची पादत्राणे घालावीत. टाचा नसलेले शूज घालणे टाळावे. स्पंजची गादी असलेली पादत्राणे वापरावीत.

१२) शक्य तेवढी विश्रांती घ्यावी. पाय सरळ व थोडा उंच करुन ठेवावा. बर्फाचा शेक घ्यावा.

(सोशल मीडियावरुन साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राजभवनात तैनात एसआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या

मुंबई: मुंबईतील मलबार हिल परिसरातील अतिसुरक्षित राजभवनात तैनात असलेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) एका…

21 सेकंद ago

खुर्च्यांचा खेळ आणि सत्तेचा ताप

मुंबई: एका बाजूला महाराष्ट्रात पावसाचा कहर सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला सत्तेच्या दालनात मंत्रिपदांच्या खुर्च्यांचा…

6 मिनिटे ago

RTO घोटाळ्यावर विधानसभेत खळबळ; विजय वडेट्टीवारांचे रॅकेटचे आरोप, SIT चौकशीची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई: राज्यातील RTO विभागातील कथित भ्रष्टाचार, बेकायदेशीर वसुली आणि वाहन नोंदणीतील अनियमिततेच्या मुद्द्यावर मंगळवारी विधानसभेत…

8 मिनिटे ago

राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहारावर काँग्रेसचा हल्लाबोल; चंपत राय, अनिल मिश्रांवर कारवाईची मागणी

मुंबई: राम मंदिरातील देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर काँग्रेसने भाजप आणि राम मंदिर ट्रस्टवर जोरदार हल्लाबोल…

14 मिनिटे ago

करडे-कारेगाव रस्त्यावर मंगल कार्यालयासमोर बेशिस्त पार्किंग, श्रीमंतांच्या लग्नाचा थाट, सामान्य वाहनचालकांना शिक्षा…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): करडे-कारेगाव (ता. शिरुर) रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाच्या परिसरात लग्नसमारंभ व इतर…

17 मिनिटे ago

अतिवृष्टीमुळे अकरावी प्रवेशाच्या विशेष फेरीला ८ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई: राज्यातील काही भागांमध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याच्या…

21 मिनिटे ago