आरोग्य

भारतात या चार कारणांनी येतो हार्ट अटॅक

भारतात हृदयाशी संबंधित आजार वाढत आहेत. हायब्लड प्रेशर,कोलेस्ट्रॉल आणि तणावपूर्ण लाईफस्टाईलमुळे लोकांच्या हृदयाचे आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते अजूनही तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि लाईफस्टाईलवर लक्ष दिले नाही तर येत्या वर्षात हृदयाचे आजार आणखीन वाढतील. वेळेच संकेत ओळखून नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. तरच या सायलेंट किलरपासून आपण वाचू शकतो.

भारतात हार्ट अटॅक वाढत आहेत

भारतात हार्ट अटॅक मृत्यूचे सर्वात मोठे कारण बनले आहेत. २०१४ ते २०१९ दरम्यान देशात हार्ट अटॅक प्रकरणात सुमारे ५० टक्के वाढ पाहायला मिळत आहे. शहरीकरण, बदलती लाईफस्टाईल, चुकीचा आहार, तणाव, ध्रुमपान आणि डायबिटीश सारखे आजार याची मुख्य कारणे आहेत. हा आजार केवळ आरोग्यापुरता मर्यादित नाही. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्था, कुटुंबाचे स्थैर्य आणि कामकाजावर परिणाम होत आहे.

हार्ट अटॅक का येतो

हृदयाला रक्त पुरवणाऱ्या आर्टरीजमधील रक्ताचा प्रवाह गुठळी आणि किंवा ब्लॉकेजमुळे रोखला जातो, त्यामुळे हृदयाच्या स्नायूपर्यंत ऑक्सिजन पोहचत नाही. काही वेळाने पेशी मरतात. जर वेळीच उपचार मिळाले नाही तर प्राणही जाऊ शकतात. बहुतांश हार्ट अटॅक हे स्ट्रोक आणि हार्ट फेल्युअर अचानक होत नाहीत. त्याचा रिस्क फॅक्ट आधीच आपल्या शरीरात उपस्थित असतात. उदा. हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, लठ्ठपणा आणि धुम्रपान असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

शरीरातील चार धोके

बहुतांशी लोकांना पहिला हार्ट अटॅक अचानक येत नाही. त्याच्यामागे काही सायलेंट रिस्क फॅक्टर लपलेले असते.

हायब्लड प्रेशर

बराच काळ असलेले हायब्लड प्रेशर धमन्यांच्या भित्तींना नुकसान पोहचवते.

कोलेस्ट्रॉल

रक्तात वाढलेले LDL कोलेस्ट्रॉल आर्टरीजमध्ये फॅटी डिपॉझिट बनवत असतो,त्यामुळे रक्तप्रवाह बाधित होतो.

ब्लड शुगर वा डायबिटीज

वाढलेली शुगर रक्ताच्या पेशींना कमजोर करते आणि हार्ट डिसीजचा धोका अनेक पटींनी वाढतो.

स्मोकिंग

तंबाखू हार्ट आणि आर्टरीज दोन्हींना नुकसान पोहचवत असतो.

हे सर्व फॅक्टर हळूहळू परिणाम करत असतात. परंतू लक्षण तेव्हा दिसतात जेव्हा धोका वाढलेला असतो. यामुळे नियमित तपासणी करायला हवी.

हार्ट अटॅकचा धोका कसा कमी करावा 

बहुतांशी जोखमीला नियंत्रित केले जाऊ शकते. योग्य खानपान, नियमित व्यायाम आणि वैद्यकीय तपासणी हार्ट अटॅकचा धोका बराच कमी केला जाऊ शकतो. यासाठी तुमच्या डाएटमध्ये सुधारणा करा. व्यायाम करा, रोज किमान ३० मिनिटे चाला. ध्रुमपान सोडा, तंबाखू सेवन बंद करा यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. आपल्या आरोग्याची तपासणी आणि काळजी न घेतल्याने बहुतांशी स्ट्रोक आणि हार्ट अटॅक येतात.जर वेळीच तपासणी केली तर डॉक्टर सुरुवातीलाच उपचार सुरु होऊ शकतो. ३० वयाच्या वरील व्यक्तींनी कुटुंबात हार्ट डिसीजचा रेकॉर्ड असेल तर नियमित तपासणी करावी.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

4 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago