भारतात हृदयाशी संबंधित आजार वाढत आहेत. हायब्लड प्रेशर,कोलेस्ट्रॉल आणि तणावपूर्ण लाईफस्टाईलमुळे लोकांच्या हृदयाचे आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. तज्ज्ञांच्या मते अजूनही तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि लाईफस्टाईलवर लक्ष दिले नाही तर येत्या वर्षात हृदयाचे आजार आणखीन वाढतील. वेळेच संकेत ओळखून नियमित तपासणी करणे आवश्यक आहे. तरच या सायलेंट किलरपासून आपण वाचू शकतो.
भारतात हार्ट अटॅक वाढत आहेत
भारतात हार्ट अटॅक मृत्यूचे सर्वात मोठे कारण बनले आहेत. २०१४ ते २०१९ दरम्यान देशात हार्ट अटॅक प्रकरणात सुमारे ५० टक्के वाढ पाहायला मिळत आहे. शहरीकरण, बदलती लाईफस्टाईल, चुकीचा आहार, तणाव, ध्रुमपान आणि डायबिटीश सारखे आजार याची मुख्य कारणे आहेत. हा आजार केवळ आरोग्यापुरता मर्यादित नाही. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्था, कुटुंबाचे स्थैर्य आणि कामकाजावर परिणाम होत आहे.
हार्ट अटॅक का येतो
हृदयाला रक्त पुरवणाऱ्या आर्टरीजमधील रक्ताचा प्रवाह गुठळी आणि किंवा ब्लॉकेजमुळे रोखला जातो, त्यामुळे हृदयाच्या स्नायूपर्यंत ऑक्सिजन पोहचत नाही. काही वेळाने पेशी मरतात. जर वेळीच उपचार मिळाले नाही तर प्राणही जाऊ शकतात. बहुतांश हार्ट अटॅक हे स्ट्रोक आणि हार्ट फेल्युअर अचानक होत नाहीत. त्याचा रिस्क फॅक्ट आधीच आपल्या शरीरात उपस्थित असतात. उदा. हाय ब्लड प्रेशर, हाय कोलेस्ट्रॉल, डायबिटीज, लठ्ठपणा आणि धुम्रपान असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
शरीरातील चार धोके
बहुतांशी लोकांना पहिला हार्ट अटॅक अचानक येत नाही. त्याच्यामागे काही सायलेंट रिस्क फॅक्टर लपलेले असते.
हायब्लड प्रेशर
बराच काळ असलेले हायब्लड प्रेशर धमन्यांच्या भित्तींना नुकसान पोहचवते.
कोलेस्ट्रॉल
रक्तात वाढलेले LDL कोलेस्ट्रॉल आर्टरीजमध्ये फॅटी डिपॉझिट बनवत असतो,त्यामुळे रक्तप्रवाह बाधित होतो.
ब्लड शुगर वा डायबिटीज
वाढलेली शुगर रक्ताच्या पेशींना कमजोर करते आणि हार्ट डिसीजचा धोका अनेक पटींनी वाढतो.
स्मोकिंग
तंबाखू हार्ट आणि आर्टरीज दोन्हींना नुकसान पोहचवत असतो.
हे सर्व फॅक्टर हळूहळू परिणाम करत असतात. परंतू लक्षण तेव्हा दिसतात जेव्हा धोका वाढलेला असतो. यामुळे नियमित तपासणी करायला हवी.
हार्ट अटॅकचा धोका कसा कमी करावा
बहुतांशी जोखमीला नियंत्रित केले जाऊ शकते. योग्य खानपान, नियमित व्यायाम आणि वैद्यकीय तपासणी हार्ट अटॅकचा धोका बराच कमी केला जाऊ शकतो. यासाठी तुमच्या डाएटमध्ये सुधारणा करा. व्यायाम करा, रोज किमान ३० मिनिटे चाला. ध्रुमपान सोडा, तंबाखू सेवन बंद करा यामुळे हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. आपल्या आरोग्याची तपासणी आणि काळजी न घेतल्याने बहुतांशी स्ट्रोक आणि हार्ट अटॅक येतात.जर वेळीच तपासणी केली तर डॉक्टर सुरुवातीलाच उपचार सुरु होऊ शकतो. ३० वयाच्या वरील व्यक्तींनी कुटुंबात हार्ट डिसीजचा रेकॉर्ड असेल तर नियमित तपासणी करावी.
(सोशल मीडियावरून साभार)
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…
महेश तपासे यांचा सवाल; परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि महिला आरक्षणावरही केंद्रावर टीका मुंबई: पाहलगाम…
मुंबई : KEM Hospital (के.ई.एम. रुग्णालय) चे नाव बदलण्याच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद…
मुंबई: महिला आरक्षण विधेयकाविरोधात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस खासदार…
मुंबई: काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत…
मुंबई: पीसीएम आणि पीसीबी गटातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेत दुसऱ्या प्रयत्नासाठी (Second Attempt) नोंदणी…