आरोग्य

तुम्ही निरोगी आहात, हे कसं ओळखाल

काही लोक सतत आजारी पडतात. यासाठी अनेकदा ते डॉक्टरांकडे जातात, पण त्याचा कधीही फायदा होत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. आपण काही कारणे जाणून घेऊया. या कारणांमुळे तुम्ही निरोगी आहात का? हे जाणून घेण्यास सोप्प होणार.

1) आहार योग्य आहे का 

आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार. आपण काय खातो, किती खातो, कधी खातो ह्या सगळ्याला फार महत्व असते.

२) व्हिटॅमिन-डी ची कमतरता आहे का

सतत आजारी पडण्यामागे अजून एक कारण असू शकते, ते म्हणजे व्हिटॅमिन-डी ची कमतरता असणे.

3) पुरेसे पाणी पिताय का

शरीरात ६०% पाणी असते, त्यामुळे शरीराच्या सगळ्याच क्रिया पूर्ण होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

4.) पुरेशी झोप घेता का

शरीर हे कोणत्याही रोगाविरुद्ध लढण्यासाठी सक्षम असते. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले शरीर रोग, सूज, जखम ह्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी काही प्रथिने सोडते.

5) तोंडाची नीट स्वच्छता करता का

तोंड हा अनेक बॅक्टेरिया शरीरात जाण्याचा प्रमुख मार्ग आहे. अनेक चांगले वाईट बॅक्टेरिया आपल्या तोंडात वाढतात आणि नंतर आपल्याला ते आजारी पाडतात

६) कुटुंबात कुणी आजारी पडते का

अनेक वेळा असे दिसून आले आहे की, रक्तातील पांढऱ्या पेशी, ज्या कोणत्याही रोगाचा सामना करतात, त्यांची संख्या जर कमी असेल तर ती व्यक्ती सतत आजारी पडते.

७) तुम्हाला ताण आहे का

धावपळीच्या जीवनात ताण-तणाव नसलेला माणूस मिळणे अशक्य आहे. जर आपल्याला अतिरिक्त ताण असेल, तर त्यामुळे शरीराची हानी होते. यापैकी जे काही कारण आपल्याला सापडेल ते दूर करून आपण निरोगी आयुष्य जगू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कल्याण वाहतूक कोंडीवर उपाययोजना, सॅटीस प्रकल्पाला गती; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…

1 दिवस ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसचा भाजपावर हल्ला; चर्चेसाठी नरेंद्र मोदी यांनाही आणा; प्रणिती शिंदे

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…

1 दिवस ago

मी उपमुख्यमंत्री नाही, भूमिपुत्र म्हणून आलो;  एकनाथ शिंदे

सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…

1 दिवस ago

नारी शक्ती वंदन की सत्ता शक्ती वंदन? महिला आरक्षणावरून भाजपवर टीका

मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…

2 दिवस ago

मुंबई युवक काँग्रेसचा SIR प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न; ‘गिग वर्कर्स न्याय अभियान’ पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…

2 दिवस ago

मोदींच्या भाषणावर वडेट्टीवारांचा हल्लाबोल; महिला आरक्षणावर भाजपवर ‘इव्हेंटबाजी’चा आरोप

नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…

2 दिवस ago