आरोग्य

तुम्ही निरोगी आहात, हे कसं ओळखाल

काही लोक सतत आजारी पडतात. यासाठी अनेकदा ते डॉक्टरांकडे जातात, पण त्याचा कधीही फायदा होत नाही. यामागे अनेक कारणे असू शकतात. आपण काही कारणे जाणून घेऊया. या कारणांमुळे तुम्ही निरोगी आहात का? हे जाणून घेण्यास सोप्प होणार.

1) आहार योग्य आहे का 

आरोग्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहार. आपण काय खातो, किती खातो, कधी खातो ह्या सगळ्याला फार महत्व असते.

२) व्हिटॅमिन-डी ची कमतरता आहे का

सतत आजारी पडण्यामागे अजून एक कारण असू शकते, ते म्हणजे व्हिटॅमिन-डी ची कमतरता असणे.

3) पुरेसे पाणी पिताय का

शरीरात ६०% पाणी असते, त्यामुळे शरीराच्या सगळ्याच क्रिया पूर्ण होण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते.

4.) पुरेशी झोप घेता का

शरीर हे कोणत्याही रोगाविरुद्ध लढण्यासाठी सक्षम असते. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपले शरीर रोग, सूज, जखम ह्यांच्या विरुद्ध लढण्यासाठी काही प्रथिने सोडते.

5) तोंडाची नीट स्वच्छता करता का

तोंड हा अनेक बॅक्टेरिया शरीरात जाण्याचा प्रमुख मार्ग आहे. अनेक चांगले वाईट बॅक्टेरिया आपल्या तोंडात वाढतात आणि नंतर आपल्याला ते आजारी पाडतात

६) कुटुंबात कुणी आजारी पडते का

अनेक वेळा असे दिसून आले आहे की, रक्तातील पांढऱ्या पेशी, ज्या कोणत्याही रोगाचा सामना करतात, त्यांची संख्या जर कमी असेल तर ती व्यक्ती सतत आजारी पडते.

७) तुम्हाला ताण आहे का

धावपळीच्या जीवनात ताण-तणाव नसलेला माणूस मिळणे अशक्य आहे. जर आपल्याला अतिरिक्त ताण असेल, तर त्यामुळे शरीराची हानी होते. यापैकी जे काही कारण आपल्याला सापडेल ते दूर करून आपण निरोगी आयुष्य जगू शकतो.

(सोशल मीडियावरून साभार)

शिरूर तालुका टीम

Recent Posts

किरकोळ वादातून शेतकरी महिलेवर लोखंडी वस्तूने हल्ला; खांदा फ्रॅक्चर

शिरूर (ओमकार भोरडे): शेतात ट्रॅक्टर का घातला आणि मुलाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी…

1 तास ago

शिरूर तालुक्यात सामाईक मोटारीच्या वादातून भावाचा भावावर हल्ला; दगडाने डोक्यात मारहाण

शिरूर  (ओमकार भोरडे): सामाईक इलेक्ट्रिक मोटार वापरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने व भावजयाने लहान…

2 तास ago

प्रेमसंबंधातून अल्पवयीन तरुणीवर अत्याचार; धर्मांतरासाठी दबावाचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा

इन्स्टाग्रामवरून ओळख, लग्नाचे आमिष, धमक्या आणि पोक्सोसह गंभीर कलमांखाली शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार…

2 तास ago

शिरूर तालुक्यात शेतकऱ्याची हत्या; परिसरात खळबळ…

शिरूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी व व्यवसायाने शेतकरी असलेले बाळासाहेब बबन तांबे यांचा…

4 तास ago

काँग्रेसला मोठा धक्का; साहेबराव कांबळेंसह यवतमाळ जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…

1 दिवस ago

पिंपळे खालसा येथील माऊली शेळके यांचे निधन

शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…

1 दिवस ago