जखम झाल्यावर धनुर्वात होऊ नये, यासाठी सर्वच डॉक्टर धनुर्वात प्रतिबंधक लसीचे इंजेक्शन देतात. टिटॅनस टॉक्साईड व टीटीचे इंजेक्शन का देतात, असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. जखम झाल्यानंतर त्यात रस्त्यावरची, घरातील, शेतातील माती वा इतर घाण जाऊ शकते.
धनुर्वाताच्या जिवाणूच्या बीजावस्था (स्पोर) असतात. हे जंतू विपरीत अवस्थेत जिवंत राहण्यासाठी बीजावस्थेत जातात या अवस्थेत ते उष्णता, कोरडेपणा यांना सहजगत्या तोंड देऊ शकतात. सुयोग्य वातावरण मिळाल्यास या बीजावस्थाचे रूपांतर धनुर्वाताच्या जंतूमध्ये होते. हे जंतू मग एक भयंकर विष निर्माण करतात. या विषाचा परिणाम मेंदूवर व स्नायूवर होतो. यामुळे धनुर्वात या रोगात स्नायू कडक होणे, शरीराची कमान होणे, दातखीळ बसणे, झटके येणे अशा गोष्टी पाहावयास मिळतात. या आजारात मृत्यूचे प्रमाण जरी आता खूप कमी झाले असले तरी, नवजात बालकांमध्ये मात्र मृत्यूचे प्रमाण ८० टक्के इतके आहे. धनुर्वात होऊ नये, यावर एकमेव खात्रीलायक इलाज म्हणजे धनुर्वाताची लक्षणे ज्या विषामुळे दिसतात त्या विषाचा बीमोड करण्यासाठी प्रतिबंधक लस घेणे.
ही लस घेतल्यानंतर सुमारे २१-३० दिवसांत आपल्या रक्तात धनुर्वाताच्या जंतूच्या विषाविरुद्ध कार्य करणारे प्रतिद्रव्य तयार होते. त्यामुळे धनुर्वात होणे टाळता येते. येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे: ती म्हणजे, आज घेतलेल्या लसीचा उपयोग महिन्या भरानंतर होतो. धनुर्वाताचा अधिशयन काल काही दिवसांचाही असू शकतो. साहजिकच जखम झाल्यावर घेतलेल्या टीटीच्या लसीमुळे, त्या जखमेमुळे धनुर्वात होणार असेल तर फारसा उपयोग होत नाही. यासाठी काय करावे.
लहान मुलांना दीड महिन्यापासून त्रिगुणीच्या लसी द्याव्या. एखाद्याने कोणतीच लस घेतली नसेल, तर महिन्याच्या अंतराने टीटीची दोन इंजेक्शने द्यावी. त्यामुळे त्याला धनुर्वातापासून ५ वर्षे संरक्षण मिळेल. नंतर दर ५ ते १० वर्षांनी एक इंजेक्शन घ्यावे. अशा प्रकारे आपण केव्हाही होणाऱ्या जखमांपासून उद्भवू शकणाऱ्या धनुर्वाताचा प्रतिबंध करू शकतो. शस्त्रक्रिया करण्यापूर्वी (शक्य असेल तेव्हा) बाळंतपणाच्या अपेक्षित तारखेच्या आधी सुमारे महिनाभर यासाठीच टीटीचे इंजेक्शन घेणे गरजेचे असते.
(सोशल मीडियावरून साभार)
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…