महाराष्ट्र

शेणातून होणार लाखोंची कमाई! सरकार खरेदी करणार बायोगॅस; ‘गोवर्धन’ योजनेला 23,731 कोटींची मंजुरी

नवी दिल्ली: शेण आणि इतर जैविक कचऱ्यापासून आता शेतकरी आणि ग्रामीण उद्योजकांना मोठे उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 23,731 कोटी रुपयांच्या ‘गोवर्धन’ (GOBARdhan) राष्ट्रीय योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत तयार होणारा कंप्रेस्ड बायोगॅस (CBG) सरकार निश्चित दराने खरेदी करणार असल्याने उत्पादकांना बाजारपेठेची चिंता राहणार नाही.

या योजनेचा उद्देश शेण, शेतीतील अवशेष, पराली आणि शहरांतील जैविक कचऱ्यापासून स्वच्छ इंधन तयार करून प्रदूषण कमी करणे, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणे आणि देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत करणे हा आहे. ही योजना पुढील १० वर्षे राबवली जाणार असून देशातील CBG उत्पादन दहापट वाढवण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे.

सरकारने सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन (CGD) कंपन्यांना स्थानिक CBG प्रकल्पांकडून गॅस खरेदी करणे बंधनकारक केले आहे. त्यानुसार 2026-27 मध्ये 3 टक्के, 2027-28 मध्ये 4 टक्के आणि 2028-29 पासून किमान 5 टक्के गॅस CBG प्रकल्पांकडून खरेदी करावा लागणार आहे.

उत्पादकांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी सरकारने 2,110 रुपये प्रति MMBTU असा CBG चा निश्चित दर पुढील १० वर्षांसाठी जाहीर केला आहे. त्यामुळे बाजारभावातील चढ-उताराचा परिणाम प्रकल्पांवर होणार नाही.

CBG प्रकल्प उभारण्यासाठी सरकारकडून भांडवली अनुदानही दिले जाणार आहे. प्रकल्पाच्या क्षमतेनुसार प्रति टन प्रतिदिन क्षमतेसाठी 2 कोटी रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळणार आहे. तसेच कचरा संकलन व्यवस्था, जैविक खत निर्मिती सुविधा, गॅस पाइपलाइन उभारणी आणि बँक कर्जासाठी हमीही सरकार देणार आहे.

CBG निर्मितीनंतर उरणाऱ्या अवशेषांपासून उच्च दर्जाचे सेंद्रिय खत तयार होणार असल्याने प्रकल्पधारकांना बायोगॅस विक्रीसोबतच सेंद्रिय खत विक्रीतूनही अतिरिक्त उत्पन्न मिळणार आहे.

‘गोवर्धन’ योजनेमुळे शेण आणि जैविक कचरा हा टाकाऊ पदार्थ न राहता स्वच्छ ऊर्जा, रोजगारनिर्मिती, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ आणि पर्यावरण संरक्षणाचा महत्त्वाचा आधार ठरणार असल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘बावनकुळ्या’ म्हणणं चालतं, मग ‘ठाणे की रिक्षा’वर एवढा संताप का?; गुणरत्न सदावर्तेंचा एकनाथ शिंदेंना सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील सातत्याने भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर…

1 तास ago

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगांची ‘पंचाईत’! ५ दिग्गज कंपन्यांची मोठ्या भूखंडांसाठी मागणी; हजारो रोजगाराच्या संधी

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (DMIC) विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा…

1 तास ago

नियमित व्यायाम करण्याचे फायदे

शरीराला आकार देणारा कुंभार म्हणजे व्यायाम असे वडीलधारी माणसे नेहमी आपल्याला सांगत असतात, कारण व्यायामाने…

1 तास ago

हाताच्या बोटांमध्ये आपले आरोग्य…

1)अंगठा: आपले फुफुस ह्याच्याशी जोडलेले असते.आपले हृदय धड धड करत असेल तर अंगठ्याची हळू हळू…

1 तास ago

राजकीय पक्ष श्रेष्ठ, विधिमंडळ पक्ष नव्हे’; शिवसेना वादाच्या सुनावणीत ठाकरे गटाचा जोरदार युक्तिवाद

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरील वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पुन्हा…

1 तास ago

रांजणगाव MIDC मध्ये सात महिन्यांत तीन कामगारांचा बळी; औद्योगिक सुरक्षा विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत म्हणुन ओळख असलेल्या रांजणगाव MIDC मध्ये…

1 तास ago