बीड: महादेव मुंडे हत्या प्रकरणात चार संशयितांची चौकशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी एक बडा मासा गळाला लागल्याची शक्यता असून हत्या प्रकरणी चार जणांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर संशयित गोट्या गीतेला ताब्यात घेण्यासाठी बीड पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. यामुळे मुंडे हत्या प्रकरणाला आता गती मिळाल्याचे पाहण्यास मिळत आहे.
बीडच्या परळी तहसील कार्यालय परिसरात महादेव मुंडे यांची २१ ऑक्टोबर २०२३ ला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला आता जवळपास दीड वर्ष पूर्ण होत आले आहे. तरी देखील मुख्य आरोपी अद्याप अटकेत नाही. या प्रकरणी अद्याप पोलिसांकडून चौकशी सुरु असून आता या प्रकरणातबडा मासा गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
महादेव मुंडे हत्या प्रकरणात चार संशयितांची चौकशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून चौकशी सुरू असून संशयित गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक रात्रीच रवाना झाले होते. चौकशी सुरू असलेला लोकांची ओळख पोलिसांकडून गोपनीय ठेवण्यात येत आहे. मात्र पोलिसांकडून अधिकृत माहिती अद्याप पर्यंत देण्यात येत नाही.
महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर सुरुवातीचा तपास परळी पोलीस स्टेशनचे पीआय रवि सानप यांच्याकडे होता. सानप आरोपीला अटक करण्यासाठी गेले असता त्यांची लगेच बदली झाल्याचे सांगितले जात आहे. यानंतर तीन जणांकडून तपास काढून घेण्यात आले. सध्या बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास आहे आणि शिवाजी बंटेवाड हे प्रमुख आहेत. संशयित आरोपी गोट्या गित्ते याला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. एकूण पाच संशयतांना सध्या ताब्यात घेतल्या असून त्यांची चौकशी सुरू आहे. एक गोपनीय महत्त्वाचा साक्षीदार आहे ज्याच्याकडे सविस्तर तपास करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली आहे.
सहा वर्षे आश्वासनांची मालिका, 'स्टॉप पेमेंट' धनादेशांचा धक्का; तिघांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रे व संगनमताचे गंभीर…
'देवाभाऊ' पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बाळासाहेब फडणवीस यांचे वक्तव्य; चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाचे कौतुक पुणे…
मुंबई: अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) जून-जुलै 2026 या कालावधीत राज्यभर बनावट औषधे, विनापरवाना उत्पादन-विक्री,…
नागपूर: भंडारा येथून सुरू झालेल्या विदर्भातील ११ जिल्ह्यांच्या 'मंडल यात्रा'च्या पार्श्वभूमीवर काँग्रेस विधिमंडळ नेते विजय…
ई-२० धोरण घाईत राबवले; वाहनधारकांचे नुकसान झाल्याचा काँग्रेसचा आरोप, फडणवीसांच्या दिल्लीवारीवरही निशाणा मुंबई: पेट्रोलमध्ये इथेनॉल…
भंडारा: सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने आयोजित मंडल यात्रा २०२६ ला आज भंडारा येथून उत्साहात प्रारंभ…