महाराष्ट्र

महादेव मुंडे प्रकरणात ४ जणांना बेड्या, बडा मासा गळाला लागल्याची शक्यता

बीड: महादेव मुंडे हत्या प्रकरणात चार संशयितांची चौकशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या प्रकरणी एक बडा मासा गळाला लागल्याची शक्यता असून हत्या प्रकरणी चार जणांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर संशयित गोट्या गीतेला ताब्यात घेण्यासाठी बीड पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. यामुळे मुंडे हत्या प्रकरणाला आता गती मिळाल्याचे पाहण्यास मिळत आहे.

बीडच्या परळी तहसील कार्यालय परिसरात महादेव मुंडे यांची २१ ऑक्टोबर २०२३ ला हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाला आता जवळपास दीड वर्ष पूर्ण होत आले आहे. तरी देखील मुख्य आरोपी अद्याप अटकेत नाही. या प्रकरणी अद्याप पोलिसांकडून चौकशी सुरु असून आता या प्रकरणातबडा मासा गळाला लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

महादेव मुंडे हत्या प्रकरणात चार संशयितांची चौकशी सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून चौकशी सुरू असून संशयित गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक रात्रीच रवाना झाले होते. चौकशी सुरू असलेला लोकांची ओळख पोलिसांकडून गोपनीय ठेवण्यात येत आहे. मात्र पोलिसांकडून अधिकृत माहिती अद्याप पर्यंत देण्यात येत नाही.

महादेव मुंडे यांची हत्या झाल्यानंतर सुरुवातीचा तपास परळी पोलीस स्टेशनचे पीआय रवि सानप यांच्याकडे होता. सानप आरोपीला अटक करण्यासाठी गेले असता त्यांची लगेच बदली झाल्याचे सांगितले जात आहे. यानंतर तीन जणांकडून तपास काढून घेण्यात आले. सध्या बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास आहे आणि शिवाजी बंटेवाड हे प्रमुख आहेत. संशयित आरोपी गोट्या गित्ते याला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एक विशेष पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहे. एकूण पाच संशयतांना सध्या ताब्यात घेतल्या असून त्यांची चौकशी सुरू आहे. एक गोपनीय महत्त्वाचा साक्षीदार आहे ज्याच्याकडे सविस्तर तपास करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेने दिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई–पुणे एक्सप्रेसवे ‘मिसिंग लिंक’ १ मेला उद्घाटन; प्रवास ३० मिनिटांनी जलद, टोलवाढ नाही

मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…

10 तास ago

आपली बस, आपली सेवा १ मे पासून एसटीचे नवे अभियान;  परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…

15 तास ago

महापुरुषांच्या अपमानावर सरकार गप्प का? वडेट्टीवारांचा संतप्त सवाल

नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…

15 तास ago

पनवेलमध्ये ९ दिवसीय मोफत अभिनय प्रशिक्षण शिबिर; नोंदणी ५ मेपर्यंत

पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…

15 तास ago

तेलंगणात एसटी विलीनीकरणाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र सरकारवर काँग्रेसची टीका

मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…

15 तास ago

VSI चे शिष्टमंडळ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर; संशोधन सहकार्याचा नवा मार्ग खुला होणार

पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…

18 तास ago