पुलवामा: पुलवामा जिल्ह्यातील पुचल या छोट्याशा गावातून आलेल्या तौसीफ अहमद गनी यांनी देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या UPSC परीक्षेत यश मिळवत IAS अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यात अभिमानाची भावना निर्माण झाली असून, ते अनेक तरुणांसाठी प्रेरणास्थान ठरले आहेत.
तौसीफ यांचे वडील मोहम्मद इशाक हे रोजंदारीवर काम करणारे साधे मजूर. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणतीही तडजोड केली नाही. स्वतः कष्ट करून, अगदी जमीन विकूनही त्यांनी मुलाच्या शिक्षणासाठी साथ दिली. त्यामुळे तौसीफ यांचं यश हे एका कष्टकरी पित्याच्या त्यागाचं फलित मानलं जात आहे.
तौसीफ यांनी २०२२ मध्ये Veterinary Science मध्ये पदवी पूर्ण केली. कॉलेजमध्ये असतानाच त्यांनी UPSC ची तयारी सुरू केली होती. पदवीचा अभ्यास आणि स्पर्धा परीक्षेची तयारी एकत्र सांभाळणं आव्हानात्मक होतं, पण त्यांनी जिद्दीने प्रयत्न सुरू ठेवले.
UPSC च्या पहिल्या दोन प्रयत्नांमध्ये (२०२२ आणि २०२४) त्यांना अपयश आलं. एका टप्प्यावर निराशा आली, पण कुटुंबाचा पाठिंबा त्यांच्यासाठी उभारी देणारा ठरला. त्यानंतर त्यांनी दिल्लीत जाऊन काही महिने एकाग्रतेने अभ्यास केला आणि अखेर तिसऱ्या प्रयत्नात यश संपादन केलं.
विशेष म्हणजे, पदवी पूर्ण केल्यानंतर त्यांना पुंछ येथे वेटरनरी डॉक्टर म्हणून सरकारी नोकरीही मिळाली होती. नोकरी करत असतानाही त्यांनी UPSCचं स्वप्न जिवंत ठेवलं. अखेरीस त्यांनी ऑल इंडिया रँक २८४ मिळवत IAS कॅडर मिळवण्याचा मार्ग मोकळा केला.
दक्षिण काश्मीरमधील एका छोट्या गावातून सुरू झालेला हा प्रवास जिद्द, मेहनत आणि चिकाटीचं उत्तम उदाहरण आहे. तौसीफ गनी यांची कहाणी अनेक तरुणांना स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी झटण्याची प्रेरणा देणारी आहे.
मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…
मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…
नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…
इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…
मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…
नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…