महाराष्ट्र

रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या तरुणीवर भुलीच इंजेक्शन देऊन लैंगिक अत्याचार

बलरामपूर: एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केला आहे. महिलेवर उपचार करण्याच्या बहाण्याने तिला भुलीचं इंजेक्शन देण्यात आलं. त्यानंतर महिला बेशुद्ध पडली आणि नंतर उपचारादरम्यान तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

संबंधित प्रकरणात रूग्णालयातील आरोपी कर्मचाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. पीडितेनं संबंधित प्रकरणात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील बलरामपूर येथे घडली आहे.

कर्मचाऱ्यानं इंजेक्शन टोचलं आणि तरुणी बेशुद्ध

पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी सांगितलं की, 25 जुलै रोजी बलरामपूर येथील पचपेवडा ठाणे अंतर्गत विमला विक्रम रुग्णालयात ही घटना घडली आहे. गैसडी येथे राहणारी 28 वर्षीय तरुणी रुग्णालयात उपचारासाठी गेली होती. त्यानंतर रुग्णालयातील पीडितेला तिथल्या एका कर्मचाऱ्याने इंजेक्शन टोचलं आणि त्यानंतर ती बेशुद्ध पडली. तेव्हाच तिचं लैंगिक शोषण करण्यात आलं.

पीडित तरुणी जेव्हा शुद्धीत आली तेव्हा आपलं लैंगिक शोषण झाल्याचं तिला समजलं. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनीही तिची सर्व बाजू ऐकून नराधमावर भारतीय न्यायसंहिता कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

या प्रकरणानंतर रुग्णालयाच्या व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. पोलीस संबंधित प्रकरणाचा तपास करत आहेत. रुग्णालयात असलेल्या रुग्णांना इंजेक्शन देण्याची परवानगी कोणत्या आधारावर देण्यात आली? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. पोलीस अटकेत असलेल्या आरोपीची चौकशी करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

10 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

10 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

10 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

10 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

10 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

10 तास ago