पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. भीमाशंकरच्या विकासासाठी २८८ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला असून, त्यातील कामांना सुरुवात झाली आहे. तसेच भीमाशंकरवाडीच्या पुनर्वसनासाठी १९३ कोटी रुपये आणि परिसरातील रस्त्यांसाठीही निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे म्हणाले की, महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी भगवान भीमाशंकराच्या चरणी प्रार्थना केली. महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद नांदावा, बळीराजा सुखी व्हावा तसेच शेतकऱ्यांवरील सर्व संकटे दूर व्हावीत, अशी प्रार्थना केल्याचे त्यांनी सांगितले.
भीमाशंकर येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे धार्मिक सुविधांसोबतच भाविकांसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधा सक्षम करण्यावर शासनाचा भर आहे. २८८ कोटींच्या विकास आराखड्यामुळे भीमाशंकर परिसराचा नियोजनबद्ध विकास होऊन भाविकांच्या सुविधांमध्ये मोठी वाढ होणार आहे.
भीमाशंकर हे धार्मिक महत्त्वासोबतच निसर्गसंपन्न परिसरामुळे पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहे. पायाभूत सुविधा विकसित झाल्यानंतर देशभरातून येणाऱ्या भाविक-पर्यटकांसाठी हे ठिकाण अधिक सोयीचे आणि आकर्षक होईल. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळून स्थानिक पातळीवर रोजगार आणि व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.
तीर्थक्षेत्राच्या विकासासोबत स्थानिक नागरिकांच्या प्रश्नांनाही शासनाने प्राधान्य दिले आहे. भीमाशंकरवाडीच्या पुनर्वसनासाठी १९३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, परिसरातील रस्त्यांसाठीही निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यामुळे भाविकांच्या सुविधांसोबत स्थानिक नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि पायाभूत सुविधांचा विकासही साधला जाणार आहे.
शासनाने हाती घेतलेली सर्व कामे निर्विघ्नपणे पूर्ण होतील आणि भीमाशंकरला येणाऱ्या लाखो भाविकांना त्याचा लाभ मिळेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. या सुविधांमुळे भाविकांचा आनंद द्विगुणित होण्यासोबतच संपूर्ण परिसराच्या विकासाला नवी गती मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
लाडकी बहीण, लाडका भाऊ, शेतकरी, युवा, कामगार, कष्टकरी आणि वारकरी अशा महाराष्ट्रातील सर्व घटकांच्या सुख-समाधानासाठी भगवान भीमाशंकराच्या चरणी प्रार्थना केली, असेही शिंदे म्हणाले. महाराष्ट्रातील जनतेवर भगवान भीमाशंकराचा आशीर्वाद कायम राहावा, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.यावेळी आमदार शरद सोनवणे, मावळ लोकसभा सह-संपर्कप्रमुख विकास रेपाळे तसेच शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…
जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…
जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…
मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…
मुंबई: काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हल्द्वानी येथील सभेनंतर सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करण्यात आल्याच्या घटनेचे पडसाद…