कन्नड: औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अमदाबाद गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी झाल्यानंतर मुतदेहाची झालेली हेळसांड पाहायला मिळाली आहे.
कन्नड तालुक्यातील नाचनवेलजवळ आमदाबाद येथील रहिवासी शांताबाई गोटीराम बनकर यांचे मंगळवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी अंजना नदीच्या पात्रात मृतदेहाला अग्निडाग दिला.
परंतु या दरम्यान पिशोर परिसरात एक तास जोरदार पाऊस झाल्याने नदीच्या पात्रात पाणी प्रचंड वाढले आणि चितेला पाण्याचा वेढा पडला.. मृतदेह अर्धवट जळत असल्याचे पाहून नागरिकांनी टायर आणून कसे बसे अंत्यसंस्कार उरकले. वारंवार मागणी केल्यानंतर ही गावात स्मशानभूमी बांधण्यात येत नसल्याने प्रेताची हेळसांड होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी यावेळी दिली.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…