कन्नड: औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अमदाबाद गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी झाल्यानंतर मुतदेहाची झालेली हेळसांड पाहायला मिळाली आहे.
कन्नड तालुक्यातील नाचनवेलजवळ आमदाबाद येथील रहिवासी शांताबाई गोटीराम बनकर यांचे मंगळवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी अंजना नदीच्या पात्रात मृतदेहाला अग्निडाग दिला.
परंतु या दरम्यान पिशोर परिसरात एक तास जोरदार पाऊस झाल्याने नदीच्या पात्रात पाणी प्रचंड वाढले आणि चितेला पाण्याचा वेढा पडला.. मृतदेह अर्धवट जळत असल्याचे पाहून नागरिकांनी टायर आणून कसे बसे अंत्यसंस्कार उरकले. वारंवार मागणी केल्यानंतर ही गावात स्मशानभूमी बांधण्यात येत नसल्याने प्रेताची हेळसांड होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी यावेळी दिली.
पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा संभाव्य राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत सर्वोच्च…
नाशिक: काँग्रेसच्या ‘संघटन सृजन अभियानाअंतर्गत’ जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांची निवड व नियुक्ती प्रक्रियेचा भाग म्हणून…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या SIR (Special Intensive Revision) मोहिमेत मोठ्या संख्येने मतदारांची नावे प्रारूप मतदार…
मुंबई : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना आगामी गाळप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी तसेच शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत अदा…
मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…