महाराष्ट्र

वसतिगृहातील मुलींचे सर्वांनी पालक म्हणून समाजिक जबाबदारी स्वीकारावी; चंद्रकांत पाटील

मुंबई: वसतिगृहातील मुलींची प्रत्येकांनी पालक म्हणून सामाजिक जबाबदारी घेतली पाहिजे,असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले. उच्च व तंत्रशिक्षण विभागाअंतर्गत असलेल्या सर्व शासकीय वसतिगृहातील अधिक्षकांसाठी राज्यस्तरीय प्रशिक्षण आणि प्रेरणादायी कार्यशाळा सिडनहॅम वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय,चर्चगेट मुंबई येथे आयोजित करण्यात आली होती. या प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी मंत्री पाटील बोलत होते.

याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी , उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर , तंत्रशिक्षण संचालक डॉ.विनोद मोहितकर, आयपीएस डॉ.रश्मी करंदीकर, सिडनहॅम वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक, राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहातील अधिक्षक व इतर अधिकारी उपस्थित होते.

शासकीय वसतिगृहातील अधिक्षक यांनी आपलं वसतिगृह सुरक्षित आणि सूंदर असण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनांचा प्रस्ताव तयार करून उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडे पाठवावा. वसतिगृहातील मुलींचे आपण पालक म्हणून जबाबदारी स्वीकारावी आणि या कार्यशाळेतुन प्रशिक्षण आणि प्रेरणादायी विचार घेऊन आपल्या वसतिगृहामध्ये सामाजिक जबाबदारी म्हणून कार्य करावे, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी दिल्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पुणे-नगर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात; प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…

3 तास ago

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

16 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

22 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

22 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

22 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

22 तास ago