amravati child
अमरावती: अमरावती जिल्ह्यातील एका महिलेने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला असून, चारही बाळं आणि माता सुखरुप आहे. चारही बाळ मुली आहेत. बाळांचे वजन कमी असल्याने सध्या त्यांना धारणी उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले आहे.
पपिता बळवंत उईके (वय 24, रा. दुनी, जि. अमरावती) या महिलेला बुधवारी (ता. 12) सकाळी साडेनऊच्या सुमारास धारणी उपजिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर महिलेच्या गर्भाशयात एकापेक्षा जास्त बाळं असू शकतात, अशी शंका डॉक्टरांना आली. पण, महिलेने सोनोग्राफीच केली नव्हती. त्यामुळे डॉक्टरही संभ्रमात होते.
पहिल्या बाळ जन्मानंतर एकापाठोपाठ एक तीन बालकांची प्रसुती झाली. ही बातमी रुग्णालयात पसरल्यानंतर उत्सुकता निर्माण झाली. चारही बाळ मुली असून त्या सुखरुप आहे. शिवाय आईची तब्येतही चांगली आहे. या चारही बालकांचं वजन 1 किलो 300 पेक्षा कमी असल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.
उपजिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रीती शेंद्र, परिचारिका तेजस्वी गोरे, नंदा शिरसाट यांच्या टीमने महिलेची सुखरुप आणि सुरक्षित प्रसुती केली. ही प्रसूती सोपी नसली तरी डॉक्टरांच्या मेहनतीमुळे आई आणि चारही बालकं सुखरुप असल्यामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
झारखंडमधील महिलेने दिला एकाच वेळी पाच बाळांना जन्म…
दोन महिन्यांपूर्वी झारखंडमधील एका महिलेने एकाच वेळी पाच बाळांना जन्म दिला होता. झारखंडच्या रांचीमधील राजेंद्र आयुर्विज्ञान संस्थान (रिम्स) या हॉस्पिटलमध्ये 22 मे रोजी दुपारी अंकिता कुमारी नावाच्या महिलेची प्रसुती झाली होती. 22 मेच्या दुपारी अंकिता कुमारी यांना अचानक प्रसवकळा सुरु झाल्या आणि अर्धा तासाच्या आत त्यांनी एकेक करुन पाच मुलींना जन्म दिला. रिम्समध्ये पाच बाळांचा एकाचवेळी जन्म होण्याची ही पहिलीच घटना आहे. याआधी एका महिलेने एकावेळी चार मुलांना जन्म दिला होता, पण तो विक्रम मोडित निघाला आहे.
सर्वाधिक बाळांना जन्म देण्याचा रेकॉर्ड…
गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार एकाचवेळी सर्वाधिक मुलांना जन्म देण्याचा रेकॉर्ड मोरक्कोच्या हलीमा सिसे यांच्या नावावर आहे. त्यांनी 2021 साली एकाच वेळी 9 मुलांना जन्म दिला. यात 5 मुली आणि 4 मुलं होती.
पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण…
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींना वेग आला असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब…
सध्या पावसाळा सुरु आहे. पावसाळ्यात ऊन कमीच पडते. त्यामुळे वातावरण जरा ओलसरच असते. तसेच कपडे…
बदलत्या जीवनशैलीनुसार संपूर्ण जग तंत्रज्ञानाच्या आविष्कारांनी वेढलेले आहे. त्यातच आजकालची तरुण मंडळी आपला बहुतेक वेळ…
सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच…
नांदेड : राज्यभर चर्चेत आलेल्या सक्षम ताटे हत्याकांड प्रकरणात आता नवा वाद निर्माण झाला आहे.…