अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) तपासणी यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब आव्हाड यांनी माळीवाडा बसस्थानकाजवळील एका हातगाडीवरून चिक्कीची तीन पॅकेट खरेदी केली. पॅकेट उघडताच त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवंत अळ्या आढळून आल्या. हा प्रकार पाहून त्यांनी विक्रेत्याकडे जाब विचारला असता, संबंधित चिक्कीचा माल माळीवाडा परिसरातील एका किराणा दुकानातून आणल्याचे विक्रेत्याने सांगितले.
या घटनेनंतर शहरात मुदतबाह्य, बुरशी लागलेले व निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकले जात असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. नागरिकांच्या मते, अन्न व औषध प्रशासनाकडून नियमित तपासणी व प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे.
दूषित अन्नपदार्थांमुळे लहान मुले, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित दुकान, पुरवठादार आणि दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच शहरातील सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची व्यापक तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळखोरांविरोधात धाडसत्र सुरू केले आहे. आंबेगाव तालुक्यात दूध भेसळीविरोधात झालेल्या कारवाईनंतर हे प्रकरणही चर्चेत आले असून, नागरिकांनी अहिल्यानगरातील दूषित अन्नविक्रीवरही तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शिरूर (सुनिल जिते): संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री क्षेत्र रांजणगाव येथील श्री महागणपती मंदिरात रविवारी पहाटेपासून हजारो…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…
दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…
ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…
मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…
मुंबई : राज्यातील जमिनीच्या आणि मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि मालकी हक्क अधिक बळकट करण्यासाठी…