अहिल्यानगर: शहरातील माळीवाडा बसस्थानक परिसरात विक्रीस असलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) तपासणी यंत्रणेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबासाहेब आव्हाड यांनी माळीवाडा बसस्थानकाजवळील एका हातगाडीवरून चिक्कीची तीन पॅकेट खरेदी केली. पॅकेट उघडताच त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवंत अळ्या आढळून आल्या. हा प्रकार पाहून त्यांनी विक्रेत्याकडे जाब विचारला असता, संबंधित चिक्कीचा माल माळीवाडा परिसरातील एका किराणा दुकानातून आणल्याचे विक्रेत्याने सांगितले.
या घटनेनंतर शहरात मुदतबाह्य, बुरशी लागलेले व निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ विकले जात असल्याची चर्चा पुन्हा रंगली आहे. नागरिकांच्या मते, अन्न व औषध प्रशासनाकडून नियमित तपासणी व प्रभावी कारवाई होत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे.
दूषित अन्नपदार्थांमुळे लहान मुले, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे संबंधित दुकान, पुरवठादार आणि दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, तसेच शहरातील सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची व्यापक तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
दरम्यान, आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळखोरांविरोधात धाडसत्र सुरू केले आहे. आंबेगाव तालुक्यात दूध भेसळीविरोधात झालेल्या कारवाईनंतर हे प्रकरणही चर्चेत आले असून, नागरिकांनी अहिल्यानगरातील दूषित अन्नविक्रीवरही तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…